पाच हजार शेतकऱ्यांना मिळणार सुरक्षा कीट

पाच हजार शेतकऱ्यांना मिळणार सुरक्षा कीट

कऱ्हाड - कीटकनाशके फवारणीनंतर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मृत्युमुखी पडले, तर काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले. यवतमाळमधील शेतकऱ्यांवरील आलेले हे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना औषधे व कीटनाशके फवारताना वापरायचे सुरक्षा कीट देण्यात येईल. 

यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशक फवारणी करताना २२ शेतकरी मृत्युमुखी पडले, तर अनेक शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

औषध फवारणीची माहिती नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी हे दु:ख आल्याचे लक्षात आल्यानंतर आता शासनाचा व जिल्हा परिषदेचा कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांत जनजागृती करण्यासाठी व्यापक प्रमाणात मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणती कीटकनाशके कशी वापरावी, ती फवारताना कोणती काळजी घ्यावी, औषध फवारल्यानंतर कोणती दक्षता घ्यावी... अशा अनेक बाबींची माहिती देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर यवतमाळसारखी दुर्घटना घडू नये यासाठीही शेतकऱ्यांबरोबरच कीटकनाशके विक्रेत्यांनाही कृषी विभागाने आवश्‍यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारची कीटकनाशकांची विक्री करावी, शेतकऱ्यांना ती विकताना त्यांना कोणत्या सूचना कराव्यात, याची महितीही त्यांना देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात येणार आहे. कीटकनाशक विक्रीबाबत विक्रेत्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनीही औषधे व कीटकनाशके फवारताना ती दक्षता घ्यावी. 
- डॉ. सी. जी. बागल, कृषी विकास अधिकारी, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com