मलेशियातील ‘सरेंडर’ तरुण जानेवारीत परतणार

मलेशियातील ‘सरेंडर’ तरुण जानेवारीत परतणार

कोल्हापूर - मलेशियात सरेंडर झालेल्या पाचही मराठी तरुणांना मायदेशी येण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली. उद्यापासून ते केव्हाही भारतात येऊ शकतात. जे चार मराठी तरुण मलेशियाच्या तुरुंगात आहेत त्यांचीही सुटका १४ जानेवारी २०१८ ला होणार आहे. इंडियन ॲम्बेसीचे हाय-कमिशन यांनी तरुणांची तुरुंगात भेट घेतली. सर्वांचा दंड इंडियन ॲम्बेसीकडून आदा करण्यात येणार आहे. त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा, यासाठी आर्थिक मदत केली आहे.

एजंटाने फसवणूक केल्यामुळे मलेशियात चार मराठी तरुणांना अटक आणि पाच तरुण सरेंडर झाले आहेत. याला प्रथम ‘सकाळ’ने वाचा फोडली. त्याचा पाठपुरावा केला. तरुणांना महाराष्ट्रासह देशभरातून पाठिंबा मिळाला. दिल्लीतील परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांच्यासह इतर भारतीयांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली आणि आता अटक असलेली चार आणि सरेंडर झालेल्या पाच अशा नऊ तरुणांना मायदेशी परत आणण्याच्या प्रयत्नांना यश येत आहे.

विशाल चव्हाण (कोल्हापूर), अजय सुभाष शिंदे (कुर्डुवाडी, जि. सोलापूर), अनिकेत संताजी साळुंखे (कराड, जि. सातारा), प्रशांत शिवानंद बनछोडे (अक्कलकोट, जि. सोलापूर) आणि प्रवीण सोमनाथ पोंडूकले (इंदोर, पुणे) सरेंडर झालेल्या या पाचही तरुणांना मायदेशी पाठविण्यासाठीचा दंड इंडियन ॲम्बेसीकडून भरण्यात येणार आहे. उद्या त्यांना मलेशियातील मायग्रेशन समितीसमोर  उभे केले जाणार आहे. तरुणांकडे पासपोर्ट नसल्यामुळे त्यांना ई.सी. (इमर्जन्सी सर्टिफिकेट) देण्याची व्यवस्था इंडियन ॲम्बेसीने केली आहे. उद्या (ता. १५) दुपारनंतर ते केंव्हाही भारतात येऊ शकतात. यासाठी केवळ त्यांच्या परतीच्या प्रवासाच्या विमानाची तिकट नातेवाईकांनी काढणे अपेक्षीत आहे. ही तिकीटाची व्यवस्था इंडियन ॲम्बेसीने करावी यासाठीही दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी ही माहिती ‘सकाळ’कडे दिली आहे.

दरम्यान तुरुंगात असलेले सोलापूर जिल्ह्यातील दोघे, नगर, जळगावमधील प्रत्येकी एक तरुणांना सचिव मुळे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे घरी संपर्क साधण्याची परवानी मिळाली आहे. त्यासाठी आवश्‍यक आर्थिक मदतही दिलेली आहे. त्यांनी तुरुंगात अभ्यासासह अन्य व्यवस्था देण्याची विनंती तुरुंगात केलेली केली आहे. १४ जानेवारीला त्यांना तुरुंगातून बाहेर काढले जाईल. त्यानंतर त्यांना इंडियन ॲम्बेसीच्या मध्ये ठेवले जाईल. तेथून त्यांना पुन्हा मायदेशी पाठविण्याची प्रक्रीया सुरू होईल, असेही माहिती सचिव मुळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com