जमिनीचा प्रस्ताव मंत्रालयवारीला

Land
Land

सातारा - भारत- चीन, भारत- पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील माजी सैनिक चंद्रशेखर जंगम यांना अखेरच्या क्षणांपर्यंत शासकीय जमीन मिळविण्यात यश आले नाही. आता त्यांना जागा मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन एक पाऊल पुढे आले आहे.

साताऱ्यातील सदर बझारमधील तीन गुंठे जमीन जंगम कुटुंबीयांना देण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रालयात नुकताच पाठवला आहे. मंत्रालयस्तरावर त्यास मंजुरी मिळाल्यास जंगम यांच्या अर्धशतकी लढ्याला यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. 

तत्कालीन शासकीय धोरणानुसार सेवानिवृत्त सैनिकांना योग्य मोबदल्यात जमिनी देण्यात येत होत्या. त्यानुसार २६ नोव्हेंबर १९६४ रोजी साताऱ्याच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे (कै.) जंगम यांनी जमीन मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी क्रमांक सी. टी. एस. २२.७ या आदेशाच्या संदर्भाने तत्कालीन नगरभूमापन नगररचनाकारांकडून मूल्यांकन करून घेत जमीन देण्याचे कळविले होते.

त्याप्रमाणे ११ ऑक्‍टोबर १९६८ रोजी शासकीय चलन क्रमांक २७ ने शासकीय कोषागारात जंगम यांनी मंजूर प्लॉटची तीन हजार ६४७ रुपये रक्कम भरली. त्यानंतर नगरभूमापन अधिकाऱ्यांनी संबंधित जागा त्यांना मंजूर झाल्याचे पत्र पाठवून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. मात्र, त्यात अडचणी येत राहिल्याने या लढ्याला यश आले नाही. दरम्यानच्या काळात जंगम यांनी मार्चमध्ये अखेरचा श्‍वास घेतला. 

आता मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने जंगम कुटुंबीयांना सदरबझार येथील तीन गुंठे जागा देण्यासाठी गती घेतली आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी (कै.) जंगम यांना सदरबझार येथील तीन गुंठे जमीन मंजूर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com