मराठी विश्‍वकोश मंडळाचा उपक्रम समाजोपयोगी

मराठी विश्‍वकोश मंडळाचा उपक्रम समाजोपयोगी

कोल्हापूर - "विद्यापीठांमध्ये ज्ञानमंडळांची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून ज्ञानवर्धन करण्याचा महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोशनिर्मिती मंडळाचा उपक्रम समाजोपयोगी आहे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोशनिर्मिती मंडळ व शिवाजी विद्यापीठ यांच्यात आज विद्यापीठात आधुनिक इतिहास, राज्यशास्त्र आणि मराठी साहित्य या तीन विषयांची ज्ञानमंडळे स्थापन करण्याबाबत सामंजस्य करार झाला. या वेळी ते बोलत होते. मंडळाचे प्रमुख अध्यक्ष दिलीप करंबेळकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शिंदे म्हणाले, ""जागतिक स्तरावरील विविध ज्ञानशाखांमधील ज्ञान मराठी भाषेत आणण्यामध्ये मराठी विश्‍वकोशनिर्मिती मंडळाची महत्त्वाची भूमिका आहे. आता नवतंत्रज्ञान आणि ज्ञानाची वाढत असलेली व्याप्ती आणि होत असलेला विस्तार लक्षात घेता विद्यापीठांमधील तज्ज्ञांना त्यामध्ये सामावून घेण्याचा मंडळाचा हेतू अत्यंत स्तुत्य आहे.'' करारांवर विश्‍वकोशनिर्मिती मंडळाच्या वतीने सचिव सुवर्णा पवार यांनी तर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्वाक्षरी केल्या. विश्‍वकोशनिर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. अरुणचंद्र पाठक, राजशेखर सोलापुरे, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. राजन गवस, इतिहास अधिविभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील, राज्यशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. अवनिश पाटील, डॉ. अरुण भोसले, विश्‍वकोश मंडळाचे सहायक संपादक सरोजकुमार मिठारी, डॉ. जगतानंद भटकर, राजस वैशंपायन, उमाकांत खामकर उपस्थित होते.

प्रकल्पाचे स्वरूप विश्‍वकोश अद्ययावतीकरण- या प्रकल्पांतर्गत विश्‍वकोशनिर्मिती मंडळाने विविध विद्यापीठांना ज्ञानमंडळांद्वारे सहभागी करून घेण्याकरिता सामंजस्य करार करण्याचा निर्णय घेतला. मंडळाने निर्मिलेल्या 20 विश्‍वकोश खंडांमधील नोंदींचे अद्ययावतीकरण करणे, विविध विषयांवरील नव्या माहितीची सातत्याने भर टाकणे यासाठी ज्ञानमंडळांची स्थापना केली आहे. प्रत्येक उपविषयासाठी स्वतंत्र ज्ञानमंडळ स्थापन करून ही सर्व ज्ञानमंडळे एकमेकांशी जोडणे व त्या आधारावर विश्‍वकोशाची पुढील रचना करणे, हा उद्देश आहे.

मराठी विश्‍वकोश खंड 1 ते 20 मधील नोंदींच्या अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कालबाह्य झालेल्या नोंदी निश्‍चित करणे, विद्यमान नोंदींचे पुनर्लेखन करणे, नव्या नोंदी लिहून घेणे आदी विविध विषयांचा यात समावेश आहे. हे प्राथमिक कामानंतर जगात प्रकाशित होणाऱ्या माहितीच्या साहाय्याने नोंदी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सातत्याने चालू ठेवणे, याही कामाचा अंतर्भाव असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com