'कर्जमाफी योजनेला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदला'

'कर्जमाफी योजनेला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदला'

कऱ्हाड : 'शेतकरी कर्जमाफी योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलावे आणि त्यांचा अपमान थांबवावा', अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी कर्‍हाडच्या विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायचा असेल, तर सर्व शेतकर्‍यांना विनाअट , विनानिकष सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, प्रमोद जगदाळे, रोहित पाटील यांनी केली.

त्याचबरोबर, सोयाबीन हमीभावाने खरेदीचे निकष बदलावे, घेवडा पिकाचा हमीभावात समावेश करून साडेसात हजार रुपये भाव द्यावा, जिल्ह्यातील प्रलंबित १२ हजार शेतीपंपांना वीज कनेक्शनसाठी निधी द्यावा, साखर कारखान्याचे वजन काटा तपासणी पथक त्वरित सुरू करावे आणि दुधाला ५० रुपये लिटर भाव द्यावा अशा इतर मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com