जलयुक्त शिवार योजना जनतेची झाली: मुख्यमंत्री

Solapur News Devendra Fadnavis talked about Jalyukta Shivar
Solapur News Devendra Fadnavis talked about Jalyukta Shivar

सोलापूर - राज्यातील चाळीस हजार तलावातील गाळ टप्प्याटप्प्याने काढण्यात येणार असून, जलयुक्त शिवार ही योजना आता जनतेची झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार योजनेतून राज्यातील चाळीस हजार तलावातील गाळ टप्प्या टप्प्याने काढण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध योजनांच्या पाहणीसाठी ते आले होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यावेळी उपस्थित होते.

मंद्रूप येथील सितामाई तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ यावेळी झाला. आयटीआयमध्ये जात मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com