सोलापूरकडे पावसाने फिरवली पाठ; खरीप हंगाम आला धोक्‍यात

file photo
file photo

एक महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम आला धोक्‍यात

सोलापूर: राज्यात सगळीकडेच धो-धो पाऊस पडत आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊस नसल्याने खरीप हंगाम धोक्‍यात आला आहे. खरिपाची चांगली पेरणी झाली असून पाऊस नसल्याने ती वाया जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. त्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून पाऊसच न पडल्याने उगवून आलेली पिके धोक्‍यात आली आहेत. दररोज ढगांची गर्दी होत असूनही पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. कृषी विभागाने निर्धारित केलेल्या क्षेत्रापेक्षा 200 टक्के पेरणी झाली आहे. खरिपाच्या पिकांची उगवणही चांगली झाली आहे. मात्र, आता पाऊस नसल्याने ती पिके धोक्‍यात आली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, यापैकी जवळपास 150 मिलिमीटर पाऊस हा जूनच्या पहिल्या आठवड्यात झाला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पाऊस पडणे गरजेचे आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com