कोल्हापूर - निकालातील त्रुटी व प्रलंबित निकाल राहिलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात यावेत, असा आदेश शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांना दिला आहे. त्याबाबतचे परिपत्रक काढले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. याबाबतचे वृत्त कोल्हापूर "सकाळ'मध्ये "विद्यार्थ्यांनो, परीक्षांचा निकाल आहे ऑन प्रोसेस' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले होते. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे गांभीर्याने घेत तात्पुरत्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला आहे.
बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल वेळेवर झाले नाहीत. गुणपत्रकेही विद्यार्थ्यांच्या हाती मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रवेशाचे मुद्दा गंभीर बनला होता. विद्यार्थ्यांकडून तक्रारींचा पाढा वाचला जात होता. तात्पुरते प्रवेश देण्यात यावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. "सकाळ'मध्ये त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. प्रशासनाने त्याची दखल घेत तात्पुरत्या प्रवेशाची सोय उपलब्ध केली.
|