कुरनूर धरणात आज २५ टक्के पाणीसाठा

dam
dam

अक्कलकोट - मागील दोन  दिवसापासून कुरनुर धरणाच्या वरील बाजूस असलेल्या बोरी आणि हरणा नदीच्या क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळ पर्यंत धरण २५  टक्क्यावर पोचले आहे.यामुळे हरणा नदी दुथडी भरून वाहत आहे. दोन दिवसातच पाणी वाढल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.यंदा उन्हाळा कडक होता.त्यामुळे धरणाची पातळी लवकरच खाली गेली होती.त्यात अक्कलकोट शहर आणि आजू बाजूच्या गावांना होणार पाण्याचा उपसा पाहिला तर अलीकडच्या काळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु दोन दिवसातच पावसाने काही अंशी समाधान केले आहे. हे धरण पूर्ण पणे तुळजापूर तालुक्यावर अवलंबून आहे.त्यामुळे या भागात ज्यावेळी पाऊस पडेल त्याचवेळी पाणीसाठा कमी जास्त होतो.मागील दोन दिवसात या परिसरात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात हळू हळू वाढ होत आहे.सध्या १८५ दशलक्ष घनफुट पाणी धरणामध्ये आहे.अजूनही दोन्ही नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कायम आहे. पाणी साठ्यात वाढ होणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी पाऊस पण मोठ्या प्रमाणावर येण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. पण अजून तरी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे धरण भरण्याची वाट शेतकरी पाहत आहेत.विशेष म्हणजे धरण जर भरले तर पुढील वर्षभर अक्कलकोट शहर आणि तालुक्याचा पाणी प्रश्न मिटणार आहे.यासाठी शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

मागील वर्षी धरण १८ सप्टेंबरला ३५ टक्के,१० ऑक्टोबरला ५६ टक्के तर १३ ऑक्टोबरला १०० टक्के भरले होते. कारणदरवर्षी हे धरण तुळजापूर तालुक्यातील पावसावर भरते. हरणा नदीचा काही अंशी तालुक्याशी येतो.सध्या तरी दोन्ही नद्यांकडून पाणी येत आहे.त्यामुळे धरण शंभर टक्के भरल्यास शेती आणि पिण्याचे पाणी याचे येऊ घातलेले संकट दूर होईल अशी अपेक्षा शेतकरी व नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com