वीर धरण भरले 96.40 टक्के

veer dam accopied 96.40 percent water
veer dam accopied 96.40 percent water

लोणंद - सातारा व पुणे जिल्हयाच्या सीमेवरील वीर धरण 96.40 टक्के भरले आहे. दरम्यान, आज दुपारी 3 वाजल्यापासून धरणाचा एक दरवाजा चार फुटाने उचलुन 4 हजार 463 क्युसेस पाणी नीरा नदी पत्रात सोडण्यात आले आहे. अशी माहिती वीर धरणाचे अभियंता अजित जमदाडे यांनी दिली आहे.

वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, नीरा खोऱ्यात गेल्या काही दिवसापासून दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे भाटघर, नीरा देवधर, गुंजवणी ही सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, गुंजवणी धरण 100 टक्के भरले आहे. भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज अखेर एकूण 427 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भाटघर धरण 73.31 टक्के इतके भरले आहे. तर नीरा देवघर धरण 74.68 टक्के तर वीर धरण आज अखेर 96.41 टक्के इतके भरले आहे.

दरम्यान, दुपारी तीन वाजल्यापासून वीर धरणाचा एक दरवाजा चार फुटाने उचलुन 4 हजार 563 क्युसेस पाण्याचा विसर्ग नीरा नदीच्या पात्रात सोडले आहे. धरण प्रशासनाने नीरा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com