वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला

Water transfusion was increased from the veer dam
Water transfusion was increased from the veer dam

वडगाव निंबाळकर - पुणे सातारा जिह्याच्या सिमेवरील वीर धरणातून रविवार ता. 22 दुपारी 3 वाजता 4 हजार 463 क्युसेसने पाणी नीरा नदीत सोडण्यात आले आहे. यामध्ये आता वाढ होउन 13 हजार 716 क्युसेसने पाण्याचा विसर्ग होऊ लागला अशी माहीती वीर धरणाचे उपविभागीय अभियंता अजित जमदाडे यांनी दिली.

गेल्या आठ दिवसांपासुन नीरा खोऱ्यात दमदार पाऊस पडत आहे. गुंजवणी धरण 100 टक्के भरले आहे. वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी येत आहे. यामुळे कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग वाढु शकतो. सोमवार ता. 23 रात्री पाण्याची पातळीत वाढ झाल्याने धरणाच्या तीन दरवाजातून 13716 क्यसेक पाणी नीरा नदी पात्रात सोडले जात आहे.

यामुळे, नदी काठच्या पुरंदर, बारामती, फलटण, सातारा, माळशिरस, पंढरपूर नागरीकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. पाणी पातळीत वाढ होत असताना नागरीकांनी नदी पात्रातील वावर टाळावा, असे अवाहन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com