आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा
आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवाesakal

आनंददायी मुलं वाढवा, सुदृढ समाज घडवा

कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
Summary

कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे ही फुलं टवटवीत राहण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षक व समाजाची जबाबदारी असते. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी काय करता येईल, याबाबत ज्येष्ठ बालसाहित्यकार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनंत भावे व राजीव तांबे यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. मुलांसंदर्भात शिक्षकांची भूमिका कशी असावी, याबाबत शिक्षक व बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड व ज्योती कपिले यांनी काही सूचना केल्या आहेत. पाचवीतील ईश्वरी निकम या चुणचुणीत मुलीने विविध क्षेत्रात घेत असलेल्या भरारीबाबत संवाद साधला आहे.

रिॲलिटी शोजमध्ये कविता म्हणाव्या

अनंत भावे : मुलांनी खूप वाचायला हवं. मराठी, हिंदी, इंग्रजीबरोबरच अन्य प्रादेशिक भाषेतील अनुवादित पुस्तके वाचली पाहिजेत. पालकांनी मुलांचा विकास कसा होतो, हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा आनंद त्यांनी लुटला पाहिजे. पालकांनी सातत्याने प्रयोगशील असले पाहिजे. कोरोनामुळे मुले दीड वर्षापासून घरीच आहेत. अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. मुले एकलकोंडी व चिडचिडी बनण्याची शक्यता असते. या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मुलांबरोबर संवाद साधायला हवा. मुलांना एकत्रित करून पालकांनी गोष्टी सांगायला हव्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com