पुण्यातील बाणेर रस्त्यावर सोमवारी (17 एप्रिलला) भीषण अपघात घडला. त्यात दोनजण दगावले. अशा घटना वारंवार समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया संकलित स्वरुपात इथे देत आहोत :
1. रितेश खडसे यांनी लिहिले आहे की पुण्यातील ट्रॅफिकबद्दल आणि खास करून पादचाऱ्यांबद्दलचा आपला लेख वाचला. मला सुचवावेसे वाटते की, शिवाजीनगरच्या शिमला ऑफिस चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी पुणे महापालिकेने थोडासा खर्च करून रस्ता ओलांडण्यासाठी वरून पादचारी पूल उभारावेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे ट्रॅफिक बंद करून पादचाऱ्यांना तो पूल वापरू द्यावा. म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. सिंगापूरमध्ये याचा वापर केला जातो. येथे स्मार्ट सिटी उपक्रमाच्या मार्केटिंगवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला गेला, मात्र नागरी जीवनात नगण्य सुधारणा झाल्या.
2. 'सकाळ'चे वाचक अजित लिहितात की कॅनडामध्ये कोणत्याही रस्त्यावर जेव्हा एखाद्याला रस्ता ओलांडायचा असतो तेव्हा 'रिक्वेस्ट' बटन दाबायचे असते. काही सेकंदांमध्ये सिग्नल बोर्डवर पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल दिसू लागतो जेणेकरून लोक सहज व सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतात. सर्व वाहनांना हा सिग्नल पाळून थांबावे लागते, अन्यथा त्यांना दंड भरावा लागतो. आपण भारतात असे काहीतरी करू शकतो.
3. वाहतुक सुधारणेसाठी सचिन यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.