पुणे : 'आमची वैचारिक घुसमट होत आहे. आम्ही 25 जुलैपर्यंतच सरकारबरोबर आहोत. 26 जुलैला जो काही निर्णय होईल, तो आरपार असेल,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (मंगळवार) दिला. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील ताणलेल्या संबंधांचे पडसादही स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटले.
शेतकरी संपानंतर राज्य सरकारने 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. मात्र, यातील तरतुदी पुरेशा नसल्याचे मत शेट्टी यांनी व्यक्त केले. नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, 'स्वामिनाथन आयोग हेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील उत्तर आहे' असा दावाही त्यांनी केला.
देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून रान उठविण्याची तयारी राजू शेट्टी यांनी चालविली आहे. राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. याच पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकारिणीची आज तातडीने बैठक बोलाविली होती. याच बैठकीत सदाभाऊ यांच्या हकालपट्टीचा निर्णय होण्याचीही शक्यता होती.
राजू शेट्टी म्हणाले..
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.