छवी राजावत यांना ऐकण्याची संधी 

छवी राजावत यांना ऐकण्याची संधी 

पुणे - "भारतातील एमबीए पदवीधर असणारी पहिली महिला सरपंच' अशी ओळख असलेल्या आणि ग्रामीण विकास या विषयात भारतात अलीकडच्या काळातील एक महत्त्वपूर्ण युवा नाव असणाऱ्या छवी राजावत या सोडा गावच्या (राजस्थान) सरपंचांचे व्याख्यान ऐकण्याची संधी पुणेकरांना लवकरच मिळणार आहे. "सकाळ'चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात छवी प्रमुख पाहुण्या म्हणून येणार असून, "सामाजिक बदलांमध्ये युवा शक्तीचे महत्त्व' या विषयावर त्या बोलणार आहेत. 

"सकाळ'तर्फे आयोजित हा कार्यक्रम येत्या 20 सप्टेंबर रोजी (बुधवारी) बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या पाच सामान्य नागरिकांना या वेळी गौरविण्यात येणार आहे. तसेच, "सकाळ'च्या निरनिराळ्या आवृत्त्यांत कार्यरत असणाऱ्या पाच बातमीदारांना या वेळी स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे. 

कोण आहेत छवी राजावत? 
- राजस्थानातील सोडा या छोट्या गावच्या सरपंच असणाऱ्या छवी एक उच्चशिक्षित महिला असून, त्या गेली 7 वर्षे सरपंच म्हणून आपल्या गावाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 
- नामवंत कॉर्पोरेट कंपनीतील भरपूर पगाराची नोकरी सोडून केवळ गावात बदल घडवावा, या परिवर्तनशील विचाराने प्रेरित होऊन त्या नोकरी सोडून गावाकडे परतल्या. 
- आजवर छवी यांना अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. 
- 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आयोजिलेल्या जागतिक संमेलनात त्यांनी व्याख्यान दिले होते. 
- सरपंच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यावर जलपुनर्भरण, रस्ते बांधणी, सौरऊर्जा अशा अनेक कामांना त्यांनी विलक्षण गती दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com