जलवाहिनीली जोडलेले 35 विदुयत पंप महापालिकेकडून जप्त

नागरिकाच्या दबावानंतर अधिका-यांनी कारवाईतील पंप पून्हा केले परत
नागरिकाच्या दबावानंतर अधिका-यांनी कारवाईतील पंप पून्हा केले परत

नागरिकाच्या दबावानंतर अधिका-यांनी कारवाईतील पंप पून्हा केले परत

हडपसर (पुणे): महापालिकेच्या जलवाहिनीस विदयुत पंप जो़डून पिण्याचे पाणी उपसा करणारे 35 पंप लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने जप्त केले. मात्र, आम्हाला पुरेसे व नियमित पाणी दया, नंतरच कारवाई करा, असा महिलांनी आक्रोश केला. संतप्त महिलांनी आक्रोश करीत लष्कर पाणी पुरवठा विभाग कार्यालयावर धडक मोर्चा नेला व अधिका-यांना घेराव घातला. अखेर अधिका-यांनी माघार घेत विदयुत पंप नागरिकांना परत केले.

लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता. 23) रात्री धडक मोहिम राबवीत जलवाहिनीला विदयुत पंप लावून पाणी उपसा करणा-या 35 मोटारी जप्त केल्या. त्यानंतर लष्कर पाणी पुरवठा कार्यालयावर महिलांनी थेट मोर्चा काढला. मोर्चा नेल्यानंतर महिलांनी हडपसर प्रभाग समिती अध्यक्ष योगेश ससाणे यांच्याशी संपर्क साधला. कारवाईबाबत त्यांना माहिती दिली. ससाणे थेट लष्कर पाणी पुरवठा कार्यालयात पोहचले. त्यांनी अधिका-यांना धारेवर धरले. ते म्हणाले, हडपसर परिसराला 48 टक्के पाणी पुरवठा कमी होत आहे. उंच भागात नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. पाण्याची वेळ नियमित नाही. पाण्याला प्रेशर कमी आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी हैराण झाले आहेत. अनेक सोसायटयांना वर्षभर टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सोसायटयांची अर्थव्यवस्था कोलम़डली आहे. नागरिक महापालिकेला प्रामाणिकपणे कर भरतात. मग त्यांना पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. आधी पाणी पुरवठा सुरळीत करा, नंतरच कारवाई करा. अन्यथा कारवाई करायला आलात तर तुमचे काही खर नाही असा दम त्यांनी अधिका-यांना भरला. तसेच कारवाई करायची असेल तर शहरातील अनअधिकृत नळजोड अगोदर तोडा. शहरात अनेक ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा होतो. हडपसरवासीयांवर अन्याय करू नका, असे कार्यकारी अभियंता संतोश पावरा यांना सुनावले.

नागरिक रतन गायकवाड म्हणाल्या, 'आमच्या नळाला आठ-आठ दिवस पाणी येत नाही. कधी आले तर पाण्याची वेळ निश्चीत नसते. सर्व कामे बाजूला ठेवून आम्हाला पाण्याची वाट पहावी लागते. कामावर जायचे की पाण्यासाठी घरी थांबायचे. अनेकदा शाळा बुडवून आम्हाला आमच्या मुलांना पाणी भरण्यासाठी घरी ठेवावे लागते. विदयुत पंपाद्वारे पाणी उपसा करण्याची आमची इच्छा नाही. महापालिकेने पुरेशा दाबाने पाणी पुरवठा केल्यास आमचे दरमहा येणारे अधिकचे 100 रूपयांचे वीजबील कमी येईल. तसेच नागरिकांना दहा हजार रूपये खर्चून विदयुत पंप विकतचे घ्यावे लागणार नाहीत. प्रत्येकवेळी टॅंकरचे पाणी विकत घेण्याची आमची परिस्थीती नाही.'

नागरिकांनी अधिका-यांसमोर मांडलेले गा-हाणे...
- आम्हला नियमित व पुरेशे पाणी दया, नंतरच कारवाई करा.
- विदयुत पंप विकत घेणे व महिन्याला अधिकचे वीज बील आम्ही का भरू ?
- उंच भागात नळाला पाणीच येत नाही.
- विदयुत पंपाने उपसा केला तरच थोडेफार पाणी मिळते.
- 48 टक्के केलेली पाणी कपात करून आमच्यावर अन्याय करू नका.
- पंपाद्वार पाणी उपसा करण्यास नागरिकांची इच्छा नाही, याला महापालिकाचा जबाबदार आहे.
- आम्ही नियमित कर भरतो, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. अन्याय सहन करणार नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com