पुणे: कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत पाच वर्षांनी परिवर्तन

Gauri Gaikwad
Gauri Gaikwad

लोणी काळभोर : पुर्व हवेलीतील राजकीय क्षेत्राचे लक्ष लागुन राहिलेल्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीत अखेर पाच वर्षानंतर परीवर्तन झाले असुन, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार व भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड याच्या पत्नी गौरी गायकवाड यांनी तब्बल अडीच हजाराहुन अधिक मतांनी विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे सतरा ग्रामपंचायत सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीतही चित्तरंजन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तन पॅनेलने चौदा जागा मिळवत नंदु काळभोर यांना धोबीपछाड दिली. नंदु काळभोर यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा पॅनेलला अवघ्या तीन जागांच्यावर समाधान मानावे लागले., तर माजी उपसरपंच देवीदास कदम यांच्या आघाडीलाही भोपळा फोडता आला नाही.

गौरी गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी व कदमवाकवस्तीचे विद्यमान सरपंच व हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदु काळभोर यांच्या पत्नी, मनिषा यांचा पराभव केला आहे. यंदाचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने नंदकुमार काळभोर व चित्तरंजन गायकवाड या दोघांनीही ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. नंदु काळभोर यांनी सत्ता राखण्यासाठी तर चित्तरंजन गायकवाड यांनुी सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम दंड या तीनही आयुधाचा वापर निवडणुकीत केला होता. यात चित्तरंजन गायकवाड यांनी बाजी मारली आहे. 

ग्रामपंचायताच्या सतरा जागांच्यासाठी नंदु काळभोर यांनी लोकसेवा पॅनेलच्या माध्यमातुन सतरा उमेदवार रिंगनात उतरवले होते. तर चित्तरंजन गायकवाड यांनी परीवर्तन प्रनेलच्या माध्यमातुन सतरा जागी उमेदवार उभे केले होते. माजी उपसरपंच देवीदास काळभोर यांनीही कांही ठिकाणी उमेदवार दिले होते. दोन्ही पॅनेलप्रमुखांनी प्रभागनिहाय जिंकण्याचे नियोजन केल्याने, या निवडणुकीत मतदारांची दिवाळी चांगली झाली. कांही प्रभागात मताला दहा ते बारा हजार दिल्याची चर्चाच या निवडणुकीत चुरस सांगुन जाते. 

नुतन सरपंच गौरी गायकवाड....
गौरी गायकवाड या उच्च शिक्षीत असुन, त्या माजी पंचायत समिती सदस्या आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कदमवाकवस्ती-फुरसुंगी या जिल्हा परीषद गटातुन भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकही लढवली होती. मात्र त्यांना पराभाव पत्कारावा लागला होता. जिल्हा परीषदेची निवडणुक संपताच, त्यांनी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन, जनसंपर्क वाढवला होता. तर दुसरीकडे चित्तरंजन गायकवाड यांनी ग्रामपंचायतीच्या मागिल पाच वर्षातील कामकाजाची चिरफाड करण्याबरोबरच, नंदु काळभोर यांच्या विरोधकांना एकत्र करण्यावर भर दिला होता. यात चित्तरंजन गायकवाड व गौरी गायकवाड दोघेही विजयी झाले. 

प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाने (कंसात पॅनेलचे नाव) 
प्रभाग क्रमांक 1- वैजंता अनिल कदम, सविता नवनाथ साळुंके, सचिन भागवत दाभाडे, (परीवर्तन पॅनल) 
प्रभाग क्रमांक 2- राजश्री उदय काळभोर (परीवर्तन पॅनेवल), बाबासाहेब बाळासाहेब काळभोर, (लोकसेवा पॅनल), 
प्रभाग क्रमांक 3- ऋषिकेश विद्याधर काळभोर, रमेश हरिभाऊ कोतवाल, नासिरखान मुनुलाखन पठाण (परीवर्तन पॅनल), 
प्रभाग क्रमांक 4- मंदाकिनी सुर्यकांत नामुगडे (परीवर्तण पॅनेल), शरीफ मिरवाज खान, वंदना सचिन काळभोर (लोकसेवा पॅनल), 
प्रभाग क्रमांक 5-  नितेश अंबादास लोखंडे, राणी विजय बडदे, अमृता मयूर कदम (परीवर्तन पॅनल)
प्रभाग क्रमांक 6- माधुरी चंद्रकांत काळभोर, रुपाली अविनाश कोरे, बाळसाहेब सोपान कदम (परीवर्तन पॅनल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com