शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेच्या आवारातील महाराष्ट्रातील पहिल्या महाखादी विक्री केंद्राचे आणि महाखादी ग्रामीण कारागीर संग्रहालयाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार अनिल शिरोळे, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, 'महाखादी हा प्रमुख ब्रॅंड म्हणून देशात विकसित व्हावा. कारण एखादी वस्तू ब्रॅंडमध्ये परावर्तित व्हावी, याकरिता त्यामध्ये 'व्हॅल्यू ऍडिशन' करावी लागते, तरच त्याचा ब्रॅंड होतो. पण आता खादी स्टेटस सिम्बॉल झाले आहे. खादीलाही ग्लॅमर आले आहे. महात्मा गांधींनी म्हटले आहे, की ग्रामीण अर्थकारण सक्षम ठेवण्यासाठी बारा बलुतेदारांच्या अंगभूत कलागुणांना जोपासले पाहिजे, तरच अर्थव्यवस्था बळकट होईल. अनेकांनी आठवड्यातील एक दिवस खादीचा वापर केला, तर अनेकांना रोजगार मिळेल.''
देसाई म्हणाले, 'खासदारांनी सहकार्य केले तर राज्यात 48 ठिकाणी खादी विक्रीची दालने सुरू करता येतील. महाखादी विक्री केंद्र भविष्यात पुणेकरांसाठी 'टुरिस्ट स्पॉट' म्हणून उदयास येईल. कारागिरांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने वेगवेगळ्या कलाकुसरीचे क्लस्टर करण्याचे ठरविले आहे. आत्तापर्यंत 72 क्लस्टर्स सुरू झाली आहेत. ग्रामीण कारागिरांना रोजगार मिळावा हाच त्यामागचा उद्देश आहे.''
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
|