आणी म्हणावं फुकटची पाटिलकी बंद करा...

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील
विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील

टाकळी हाजी (शिरूर, पुणे): राज्यात भाजप शिवसेना सरकारने कर्जमाफी करून शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे. नोटाबंदी करून आपल्याच पैशासाठी रांगेत उभे केले. शेतकऱ्याला मदत करण्याची भुमीका सोडून चावडी वाचन करून शेतकऱ्यांची आबरू चव्हाट्यावर मांडण्याचे काम होत आहे. परदेशातून शेतमाल आयात करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडले जात आहे. यापुढे मत मागण्यासाठी येणाऱ्यांना जाब विचारा आणी म्हणाव फुकटची पाटिलकी बंद करा... अशी टिका राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.

जांबूत (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय महामार्ग 50 जांबूत ते काठापूर बुंद्रुक रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भिमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, सभापती सुभाष उमाप, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभीयंता प्रभाकर जाधव, शाखा अभीयंता सी. एस. गुंजाळ, जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे, सवीता बगाटे, पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे, राजेंद्र गावडे, वासुदेव जोरी, सरपंच जयश्री जगताप, सरपंच दामुशेठ घोडे, बिपीन थिटे, भाऊसाहेब औटी, रामदास ढोमे, शंकर जांभुळकर आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

वळसे पाटील म्हणाले की, राज्याच्या एकून जिल्ह्याच्या नियोजनाच्या 3 हजार कोटीच्या रकमेवर डल्ला मारण्याचे काम सरकारने केले आहे. त्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परीषदेच्या माध्यातून नियोजनातून होणारे लहान लहान रस्त्यांची कामे बंद पडली आहेत. राज्यात भारनियमन करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. आदर्श ग्राम योजना आणून गाव आदर्श करणार असे सांगितले होते. त्यातून किती कामे झाली. याचा आढावा घ्यावा. यापुढे आपल्याला एकत्रीत येऊनच विकास कामे करावयाची आहेत. लवकरच शिरूर व आंबेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संघर्ष यात्रा मोर्चा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यात येणार आहे.

जनतेने लक्ष द्यावे...
सत्य नारयणाची पूजा एकजण घालतो. अन् प्रसाद दुसराच वाटत फिरतो. काम एकजण करतो अन् प्रचार दुसरा करत फिरतो. राज्यात विज, महागाई, अत्याचार, बलात्कार, जातीपातीचे राजकारण, रोजगारासारख्या समस्या वाढल्या आहेत. राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असून, शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे लाभ मिळत नाही. पण हे सरकार मी लाभार्थी...आपले सरकार... असा रोज प्रचार करताना दिसते. या सरकारच्या माध्यमातून लोकशाही संकटात आली असून तुमचे स्वातंत्र संपुष्ठात येऊ लागले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com