मलठणमध्ये रोहित्रातील ऑइलसाठी शेतकऱ्यांकडून वर्गणी

file photo
file photo

टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): महावितरणच्या रोहित्रामध्ये ऑइल कमी होत असल्याने रोहित्र जळाल्याचे प्रकार अधिक आहेत. अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील मलठण येथे रोहित्रामध्ये ऑइल टाकण्यासाठी शेतकरी वर्गणी गोळा करत आहेत.

शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात डिंभा उजव्या कालव्यामार्फत पाणी व्यवस्थापन झाल्याने 80 टक्के बागायती क्षेत्र झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून थकीत बिलासाठी महावितरणने कडक मोहीम राबविली होती. त्यातून अनेक ठिकाणी विजेची बिले भरून घेतली जात होती. या वर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरीदेखील पाण्याने भरलेल्या आहेत. त्यामुळे पिकांना चांगले पाणी मिळणार आहे. त्यातून रब्बी हंगामातील पिकांचे उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. महावितरणच्या माध्यमातून मिळणारी वीज हे त्यातील महत्त्वाचे साधन आहे. यासाठी रोहित्र सुस्थितीत असणे आवश्‍यक आहे. मात्र शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील रोहित्रामध्ये ऑइलची पातळी असल्याने रोहित्र जळण्याची शक्‍यता वाढली आहे. या परिसरात 25 ते 30 टक्के रोहित्रे जळत आहेत. याकडे या भागातील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. पिकांची काळजी घेण्यासाठी येथील शेतकरी वर्गणी गोळा करून रोहित्रामध्ये ऑइल टाकणार असल्याची माहिती शेतकरी नाना फुलसुंदर व रामदास बारगळ यांनी दिली.

या बाबत अधिकारी हितेंद्र भिरूड म्हणाले, "शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात 20 टक्के रोहित्रे जळतात. अवाजवी वीजभारामुळे व आकडे टाकून वीजचोरीमुळे रोहित्रे जळतात. रोहित्राच्या ऑइल पातळीची तपासणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते. केडगाव येथील महावितरणच्या कार्यालयातून हे ऑइल पुरविले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेगळी वर्गणी काढू नये. याबाबतची सर्व जबाबदारी महावितरणची असते.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com