जीवनात समाजनिर्मितीलाच प्राधान्य  गडाख 

जीवनात समाजनिर्मितीलाच प्राधान्य  गडाख 

पुणे - "यशवंतराव चव्हाण यांचे विचार आत्मसात केले. संकटे अंगावर घेत संघर्षाला धाडसाने सामोरे गेलो. राजकारणाला दुय्यम स्थान देत समाजनिर्मितीला प्राधान्य दिले. समाजनिर्मिती हीच समाजाला पुढे नेईल,' अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक व कॉंग्रेसचे नेते यशवंतराव गडाख यांनी सोमवारी (ता. 18) येथे व्यक्त केली. 

गडाख यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, "मसाप'चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, प्रकाश पायगुडे, गडाख यांच्या पत्नी शारदा गडाख उपस्थित होते. 

गडाख म्हणाले, ""शहाणपण हे शिक्षणाने नव्हे, तर अनुभवाने येते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत आमची पिढी पुढे आली. संकटे अंगावर घेण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांनी दिला. गरिबी, दारिद्य्र, शेतीचे प्रश्न तेव्हाही होते. हे प्रश्न सोडवतानाच शिक्षणाला प्राधान्य दिले. शैक्षणिक संस्थांबरोबरच उद्योग- व्यवसायही काढले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राजकारणात सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, खासदार झालो; पण राजकारणाला कायम दुय्यम स्थान देत समाजनिर्मिती करत राहिलो.'' 

""जीवनात अनेक कडू-गोड अनुभव आले. खासदारकी गेली, भाषणात परखडपणे बोलल्यामुळे सहा महिने मतदार यादीतून नावही गायब केले. माझ्यासाठी राजकारणाचा एक दरवाजा बंद झाला. मात्र, साहित्य क्षेत्राचा दुसरा दरवाजा खुला झाला. बोलत राहिलो, लिहीत राहिलो. साहित्यिकांमध्ये रमलो. अनेकांनी मला फसविले, मात्र आज 75 व्या वर्षी मी समाधानी आहे. माझ्या मनात कोणाबद्दलही राग किंवा द्वेष नाही,'' अशा शब्दांत गडाख यांनी मनोगत व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com