विचार पटला, दुष्काळ हटला... 

विचार पटला, दुष्काळ हटला... 

पुणे - गावातील पाणीटंचाई दूर करण्याची ताकद प्रत्येकाच्या मनगटात आहे, त्यासाठी हवी इच्छेची वज्रमूठ, याची जाणीव ‘सकाळ माध्यम समूहा’ने गावागावांत निर्माण केली. त्याच्या जोडीला ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून दोन लाख रुपयांचा मदतनिधीही दिला. त्यासाठी लोकसहभाग, नियोजनपूर्वक आणि सूत्रबद्ध कामाची अट घातली. गावकरी हिरीरीने कामाला लागले. सपाट मैदान असलेले ओढे, नाले, नद्या यांचे खोलीकरण केले. पावसाळ्यात त्या ठिकाणी साठलेले पाणी बघून गावकऱ्यांचे डोळे आनंदाने पाणावले. अनेक गावांनी हा जलमंत्र जोपासत भविष्यात केलेल्या वाटचालीने त्यांची जलसमृद्धीकडे वाटचाल सुरू झाली.

‘सकाळ’ने २०१३ मध्ये पन्नास गावांमध्ये जलसंधारणाचे काम प्रथम सुरू केले. ओढे, नाले, नदी, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी यांसारख्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण त्याद्वारे केले. 

समाजामध्ये सकारात्मकता निर्माण करून बदल घडवून आणणे, ही ‘सकाळ’ची भूमिका कायम राहिली आहे. महिलांचे तनिष्का व्यासपीठ, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे ‘यिन’ संघटन ही त्याची प्रतीके आहेत. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीने आणि या व्यासपीठांच्या माध्यमातून पाच वर्षांत राज्यात जलसंधारणाचे मोठे काम झाले. अनेक गावे टंचाईमुक्त झाली. ‘लोकांनीच करायचा लोकांचा उद्धार’ ही संकल्पना जलसंधारणात राबविली गेली. त्याला मोठे यश आले. 
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com