इंदापूरात शेतकऱ्यांची पीक वाचविण्यासाठी धडपड

water
water

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरीतील गाळ काढणे, विहिरींची खोली वाढवून पाण्याचे आणखी स्त्रोत मोकळे करून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

इंदापूर तालुक्यातील नीरा नदीचे पाणी चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आटल्याने नीरा नदी कोरडी पडली होती. शेतकऱ्यांना नदीचे पाणी मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळून गेली आहेत. नदीचे पाणी चालू वर्षी लवकर कमी झाल्याने नदीकाठच्या गावातील विहिरींच्या पाण्याची पातळीही खालावली. विहीरीतील पाणी लवकर संपू लागल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासुन जुन्या विहिरींची खोदाई करुन खोली वाढविण्यास सुरवात केली आहे. यांत्रिक पद्धतीच्या मशीनीचा (यारी) वापर करून विहिरीतील दगड बाहेर काढण्यात येत आहेत. तसेच विहिरीमध्ये सुरूंग लावून दगड फोडण्याचे काम सुरु आहे. अनेक शेतकरी विहिरीतील गाळ काढून पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.
चालू वर्षी पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे पाणी मिळण्यास उशीर झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कालव्याचे पाणी येवून गेल्यानंतर विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मोलाची मदत होते. मात्र, उशीरा पाणी आल्याने उशीरा विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास सुरवात झाली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com