नंदुरबार : लगतच्या पाड्यावरील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी जात असताना नदी ओलांडताना तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली कुंडलचा मालपाडा (ता.धडगाव ) येथे काल (ता.१५) दुपारी घडली. नीलेश दीलवर पाडवी (वय ४), मेहेर दिलवर पाडवी (वय ५) आणि पार्वती अशोक पाडवी (वय ५) अशी मृत बालकांची नावे आहेत.
धडगाव तालुक्यात अद्यापही अनेक सोयी -सुविधा नाहीत. धडगाव तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार करता आजही लहान -मोठ्या पाडयांची वस्ती अधिक आहे. त्यामुळे काही पाड्या -वाड्यांवर साधी किराणा दुकानही नाही. त्यामुळे त्या परिसरात किराणा दुकान असलेल्या ठिकाणाहून बाजार करावा लागतो. त्याच परिस्थितीने तीन चिमुकल्यांचा बळी घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार कुंडलचा मालपाडा येथे वास्तव्यास असलेले नीलेश, मेहेर व पार्वती पाडवी तीन चिमुकल्यांना आईने बाजूला असलेल्या पाड्यावरील किराणा दुकानावरून काही तरी सामान आणण्यासाठी पाठविले.
चिमुकले आनंदाने खेळत-बागळत दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात जात होते. या दरम्यान देवानंद नदी ओलांडताना तिघ चिमुकल्यांवर काळाने घाला घातला. नदी ओलांडताना त्यांना नदीचा पाण्यातील खड्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते आपल्या पद्धतीने नदी ओलांडत असताना तिन्ही नदीतील पाण्याचा खड्यात पडले.
खड्यातील खोली अन् पाण्याचा स्रोत जास्त असल्याने तिघांनाही खड्यातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुले किराणा दुकानावर गेले आहेत अद्याप कसे आले नाहीत, म्हणून त्यांचा पालकांनी मुलांचा शोध सुरू केला, त्यावेळेस ही दुर्दैवी घटना लक्षात आली. धडगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.