आधुनिक युगातही सर्जा-राजाचे महत्व कायम

bullocks
bullocks

तळवाडे (नाशिक) - सध्याचे युग हे आधुनिक युग आहे, नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये केला जात आहे. शेतीमध्ये सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला, तरी आदिवासी भागातील शेतकरी वर्गात सर्जा-राजाचे म्हणजेच बैलजोडीचे महत्व आजही कायम आहे.

पूर्वी शेतीमध्ये मशागतीसाठी सर्जा-राजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असे. जमीनदार शेतकरी यांच्याकडे पाच ते सहा बैलजोडया असत. परंतु, सध्याच्या काळात मजुरांअभावी शेतीत कामे करून घेणे जिकीरीचे झाले आहे. जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ट्रॅक्टरचा शेती मशागतीसाठी वापर करण्यात येत आहे. मात्र चार ते पाच बैलजोडीऐवजी दोन किंवा एक बैलजोडी ते सोबत ठेवत आहेत.

उन्हाळ्यामध्ये शेती मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करण्यात येत असली तरी पावसाळ्यामध्ये मात्र शेतकऱ्यांना बैलजोडीवरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे आदिवसी ग्रामीण भागात आजही सर्जा-राजाचे महत्व कायम आहे. मात्र पशुपाकांनी पशुधन पाळणे कमी केले असल्यामुळे सर्जा-राजाच्या किमती लाखाच्या वर पोहोचल्या आहेत. सध्या शेती अडचणीची वाटत असली तरी मात्र शेतकरी सर्जा-राजाला कायम आपल्यासोबत ठेवत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com