दोन लाख पाच हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र बोडंअळीग्रस्त

दोन लाख पाच हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र बोडंअळीग्रस्त
दोन लाख पाच हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र बोडंअळीग्रस्त

म्हसदी (धुळे) : धुळे जिल्ह्यात यंदा दोन लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली होती.बोडंअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. शंभर टक्के क्षेत्र बोडंअळीग्रस्त असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीतून पुढे आले आहे.

आजपासून (मंगळवार) पुढील सलग आठ दिवस जिल्ह्यातील चार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पचंनामे केले जातील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी आज दिली.

नुकसानीच्या भरपाई देण्याचा निर्णय....!
कापूस पिकांवर बोडंअळीच्या प्रादुर्भावामुळे व धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला आहे. नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव सु. ह. उमराणीकर यांनी जिल्हा अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी व तहसीलदांराना दिला आहे.

यावर्षीच्या हगांमात जिल्ह्यात कापूस पिकांवर बोडंअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना मदत देण्याबाबतीची मागणी करण्यात येत आहे. तसेच धान पिकावर देखील तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना मदत देण्याबाबतीची मागणी केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये किड हल्ल्याचा समावेश आहे. पाच डिसेंबरला झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत बोडंअळी व धान पिकावर झालेल्या किड हल्ल्यामुळे नुकसान झालेल्या बाधित शेतक-यांना मदत देण्यासाठी नुकसानीच्या पचंनामे तात्काळ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा दिवसात पचंनामे करणे आवश्यक असल्याचे शासनाचा आदेश आहे. पचंनामे करत असताना नुकसानग्रस्त शेतीचे जीपीएस ऐनेब्लड मोबाईल अॅपच्या सहाय्याने काढण्यात यावेत जेणेकरून नुकसानीच्या दाव्याची ग्राह्यता पडताळता येईल. नुकसान ठरविण्यासाठी पिकांची नोंद 7/12 मध्ये असणे आवश्यक आहे.

पचंनामे झाल्यानंतर 33% पेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकाच्या बाबतीत शेतक-यांना मदत देण्यासदंर्भातील सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करण्याचे पत्रात नमूद केले आहे. साक्री तालुक्यात सर्वात जास्त धान पिकाची पेरणी झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.धान पिकावर तुडतुडे किड हल्ल्याने मोठे नुकसान झाले आहे. या दोन्ही नुकसानीच्या पचंनाम्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक, स्थानिक कर्मचारी यांची समिती असणार आहे. शेतक-यांनी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com