राज्यात वीज पोलिस ठाण्यांना आता कायमचे कुलूप 

residenational photo
residenational photo

नाशिकः राज्यात वीज बिलांच्या कामकाजासाठी 2006 मध्ये स्थापन केलेली प्रादेशिक पोलिस ठाणे कायमचे बंद होणार आहे. शासनाचे तसा निर्णय घेतल्याने राज्यभरातील या पोलिस ठाण्यांना कामयचे कूलूप लागणार आहे. 

वीज विषयक अडचणी सोडविण्यासाठी राज्यात वीज मंडळाचे विभाजन करुन स्वतंत्र तीन कंपन्यात रुपांतर करण्यात आले. वीज कायदा करण्यासह तीन्ही कंपन्याना स्वतंत्र 
नफा कमाईचा आधिकार देतांना, वीज विषयक चोऱ्या थांबवून वसूली वाढविण्यासाठी महसूल विभागानिहाय पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्याचनंतर 2006 पासून वीज गळती व वसूलीचे प्रश्‍न कायमच असल्याने वीज पोलिस ठाण्यांचा खर्च वाचविण्यासाठी शासनाने वीज पोलिस ठाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने काल गुरुवारी (ता.22) शासनाने नाशिक रोडच्या वीज पोलिस ठाण्यासह राज्यातील 6 वीज पोलिस ठाणे बंद केले आहेत. 

राज्यात 2006 पासून कार्यरत असलेल्या या पोलिस ठाण्यातील वीज चोरीच्या प्रकरणाचे कामकाज ज्या भागात वीजचोऱ्यांचे प्रमाण आधिक आहे. अशा पोलिस ठाण्यांकडे 
वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. जास्तीत जास्त वीजचोऱ्या भागातील पोलिस ठाण्यांमध्ये वीज पोलिस ठाण्यातील कामकाज वर्ग केले जाणार आहे. उत्तर महाराष्ट्राचे पोलिस 
ठाणे नाशिक रोडला वीज भवनच्या आवारात आहे. एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या वीज भवनाचे आता शकल पडली आहे. 5 पैकी खांदेशातील तीन 
जिल्ह्याचे स्वतंत्र परिमंडळ झाले. त्यानंतर आता नाशिक व नगर या दोन जिल्ह्याचा मुंबई विभागात समावेश करुन वीज कंपनीने यापूर्वीच उत्तर महाराष्ट्राचे स्वतंत्र आस्तीत्व 
संपविले आहे. त्यानंतर आता पोलिस ठाणेही बंद झाले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com