तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा 

तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा 

जळगाव ः जळगावसह जिल्ह्यात आजपासून (ता.23) तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याचा धोका आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांना दिला आहे. काही ठिकाणी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी अगोदरच हलविले आहे. उद्या आषाढी एकादशी असल्याने पावसाचा जोर कायम राहील. 
जळगावसह जिल्ह्यात काल (ता.22) दुपारी सलग तीन तास धुव्वाधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. आजही सकाळपासून सतत पाऊस सुरु आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज रविवार असल्याने बाजारपेठा बंद होत्या. यामुळे नागरिकांनी घरीच बसणे पसंत केले होते. ज्यांना आवश्‍यक कामे होती ते रेनकोट, छत्रीचा वापर करून कामांना जात होते. 

आपत्ती कक्ष सुरू 
जिल्हा आपत्ती निवारण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत करण्यात आला आहे. चोवीस तास हा कक्ष सुरू आहे. नागरिकांनी आपत्तीत काही मदत असल्यास या संपर्क कार्यालयात केव्हाही संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com