जळगावकरांच्या नशिबी कायमच "पाणी-बाणी'! 

जळगावकरांच्या नशिबी कायमच "पाणी-बाणी'! 

जळगावकरांच्या नशिबी कायमच "पाणी-बाणी'! 


जळगाव महापालिकेच्या माध्यमातून वाघुर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. परंतु, धरणात पाणीसाठा मुबलक असतानादेखील कृत्रिम पाणीटंचाईचा जाच जळगावकरांच्या पाचवीला पुजला आहे. कालबाह्य झालेल्या जलवाहिनी, सदोष यंत्रणा, त्यातच महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष व पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे पाणीपुरवठा यंत्रणेतील दोष वर्षानुवर्षे तसेच आहेत. एकीकडे दोन हजार रुपयांची पाणीपट्टी भरत असताना जळगावकरांना वर्षभरातील 365 पैकी अवघे 100 दिवसच पाणी मिळते. त्यातही जलवाहिनी, व्हॉल्व्ह गळतीच्या नावाखाली पुरवठा विस्कळित झाला की "पाणी बाणी' निर्माण होते. 
------ 
जळगाव शहराला महापालिकेकडून वाघुर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 2008 पासून ही योजना कार्यान्वित झाली. तेव्हापासून आतापर्यंतच्या दहा वर्षांत काही अपवाद वगळता धरणात पुरेसा साठा असल्याने जलस्रोत नाही म्हणून पाणीटंचाई जाणवल्याचे दिसत नाही. मात्र, धरणात पाणीसाठा असूनही केवळ कालबाह्य झालेली यंत्रणा, यंत्रणेतील दोष आणि ते दूर करण्यासाठी कमी पडणारी इच्छाशक्ती यामुळे जळगावात अधूनमधून टंचाई निर्माण होतच असते. मुळात, वाघूर धरणातून शहरापर्यंत 1200 मिलिमीटर व्यासाची सुमारे 13 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या वाहिनीबद्दल सुरवातीपासून शंका आहे. गेल्या दहा वर्षांत या वाहिनीसह अन्य उपजलवाहिन्या नेहमीच नादुरुस्त होतात, गळती सुरू होते. त्यातूनच टंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी लागणारी सुसज्ज यंत्रणा नसल्याने दुरुस्तीचे कामच दोन-तीन दिवस चालते, तोवर नागरिकांचे हाल होतात हा नेहमीचाच अनुभव झालाय.. 

पाणीपुरवठा ही अत्यावश्‍यक सुविधा असल्याने महापालिकेने पाणीपुरवठ्यात समस्या निर्माण झाल्यास पर्यायी यंत्रणा ठेवण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, महापालिका प्रशासनाने यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्नच केले नाही. तसेच जलवाहिनीला मोठी गळती अथवा समस्या निर्माण झाल्यास शहरातील पाच लाख नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी पर्यायी व्यवस्था केली नाही. 
पालिका प्रशासन व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमधील कामाची उदासीनता दिसून येत आहे. यात मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
------ 
"अमृत'चे पाणी मिळणार कधी? 
केंद्र व राज्य शासनाच्या "अमृत' योजनेंतर्गत शहराला पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजनेच्या कामाला सुरवात झाली असून, शहरातील मुख्य तसेच अन्य जलवाहिन्यांचे जाळे अद्ययावत केले जाणार आहे. आणखी दोन वर्षे तरी हे काम पूर्ण होण्यासाठी लागतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दररोज किंवा दिवसाआडही होऊ शकतो. अर्थात, त्यासाठी जळगावकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या कामाचेही योग्य "मॉनिटरिंग' होणे गरजेचे आहे. 
------------- 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com