एसटी कर्मचाऱ्याचे प्रलंबित चौकशी प्रकरण तीन महिन्यात निकाली

residenational photo
residenational photo

नाशिकः एसटी कर्मचाऱ्याला निलंबीत केल्यानंतर तीन महीन्याच्या आतच त्यांच्यावरील अरोपांची चौकशी पुर्ण करुन प्रकरण निकाली काढावे.असे सष्ट आदेश प्रशासनाने दिले आहेत. .साधारण चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांवर महामंळात चौकशी सुरु असते. 
राज्य परीवहन महामंडळात राज्यात एक लाखाच्यावर कर्मचारी आहे.त्यात उत्पन्नाचा स्रोत फक्त प्रवासी वाहतुकीतुन आहे. आणि तो काटेकोर पणे हिशोब आणुन देणारा महत्वाचा घटक फक्त वाहक ( कंडक्‍टर )आहे.त्यांच्या भरवशावरच एसटीचा गल्ला सुरुळीत जमा होत आहे. त्या वाहकांच्या कारभारावर नेहमीच कटाक्षाने लक्ष्य दिले जाते.त्यात थोडाही गैरव्यवाहर आढळला की त्यांना निलंबीत केले जाते. निलंबीत केल्यानंतर तीन महीन्यात चौकशी पुर्ण करुन प्रकरण निकाली काढावे. असा नियम असला तरी साधारण पहील्या सुनावणी नंतर निलंबन मागे घेऊन चौकशी सुरु ठेवली जात असते. अनेक वर्ष ती चौकशी सुरु राहते. आता मात्र प्रशासनाने तीन महीन्यातच सक्षम अधीकाऱ्यांनी चौकशी पुर्ण करण्याचे आदेश काढले आहे.त्यामुळे तीन महीने निलंबन अटळ राहणार आहे. तीन महीन्यात निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजुने लागला तर तो टिकेल. मात्र प्रशासनाच्या बाजुने लागल्यास पुन्हा दाद मागण्यातच वेळ जाणार आहे. त्यामुळे घोटाळ्यात सापडणाऱ्या कर्मचारी वर्गावर आता टांगती तलवार राहणार आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com