मुंबई जलमय झाल्याने 800 टन कोंबड्या थांबल्या

मुंबई जलमय झाल्याने 800 टन कोंबड्या थांबल्या

नाशिक - मुंबई जलमय झाल्याने राज्याच्या विविध भागांतून पाठवण्यात येणाऱ्या 800 टन ब्रॉयलर कोंबड्या दोन दिवसांमध्ये थांबल्या आहेत. हैदराबादमध्ये 75 रुपये किलो या भावाने कोंबडी विकली जात असल्याने मराठवाड्यातील व्यापाऱ्यांनी राज्यातून कोंबडी खरेदीला पसंती दिली आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये 54 ते 55 रुपये किलोवरून ब्रॉयलर कोंबडीचा भाव 64 रुपयांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. अशातच पावसामुळे रस्ते बंद पडल्याने उत्पादकांनी मुंबईकडे कोंबड्या पाठवण्याकडील हात आखडता घेतला आहे. दिवसाला 800 टन कोंबड्या मुंबईकरांसाठी पाठवल्या जातात; पण काल आणि आज त्यातील पन्नास टक्के कोंबड्या विक्रीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत, असे आनंद हॅचरीजचे संचालक उद्धव आहेर यांनी "सकाळ'ला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com