नाशिकमध्ये टाळे ठोकण्याच्या आंदोलनाला जोर

नाशिकमध्ये टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने धरला जोर
नाशिकमध्ये टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने धरला जोर

नाशिक - शेतकरी आंदोलनाची भूमी म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी संपाचा वारु स्वतःच्या खांद्यावर घेतला आहे. कुणाचेही नेतृत्व मान्य नसलेले शेतकरी आज सलग सहाव्या दिवशी रस्त्यावर उतरले. तलाठी, ग्रामपंचायत, तहसिलदार कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या आंदोलनाने जोर धरला आहे.

प्रशासनामध्ये चलबिचल वाढली असून पोलिसांकडून आंदोलन दडपण्यासाठी टाकलेल्या पावलांमुळे शेतकऱ्यांमधील रोष अधिक बळावला आहे. मुळातच, शेतकरी आणि त्यांच्या प्रश्‍नांची, आंदोलनाची फारशी माहिती नसलेल्यांकडे संप हाताळण्याची धुरा सोपवण्यात आल्याने आंदोलनाची धग कायम राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात 19 जूनपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्याचा फतवा काढण्यात आल्याच्या माहितीने सोशल मीडियात धूम उठली आहे. साताळी (ता. येवला) येथे रस्त्यावर कांदे ओतत शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्याने मारहाण करत दहनही करण्यात आले. नैताळे (ता. निफाड) येथील तलाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. निफाड तहसिलदार कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. नगरसूल (ता. येवला) येथील तलाठी आणि ग्रामपंचायत कार्यालयाला शेतकऱ्यांनी कुलुप लावले. वाखारीमध्येही तलाठी कार्यालय बंद करण्यात आले आहे. पिंपळगाव जलाल टोक नाक्‍यावर समाजकंटक सापडत नाहीत म्हणून अपयश झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर दरोडा-हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप येवल्यामध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसेच याच प्रश्‍नावर तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com