‘आयसीटीएसएम’ची फेरपरीक्षा घेणार

नाशिक - आयटीआयच्या परीक्षेतील गोंधळासंदर्भात सोमवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांना निवेदन देताना मनविसेचे पदाधिकारी व विद्यार्थी.
नाशिक - आयटीआयच्या परीक्षेतील गोंधळासंदर्भात सोमवारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांना निवेदन देताना मनविसेचे पदाधिकारी व विद्यार्थी.

नाशिक - आयटीआयच्या इन्फार्मेशन कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी सिस्टिम मेन्टेनन्स (आयसीटीएसएम) या विषयाची परीक्षा ऐनवेळी ऑनलाइन घेताना अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्‍न विचारल्याने अनुत्तीर्ण झाल्याने या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची जोरदार मागणी आज ‘मनविसे’ने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक एस. आर. सूर्यवंशी यांच्याकडे केली. आगामी महिनाभरात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुन्हा ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे आश्‍वासन श्री. सूर्यवंशी यांनी दिले. 

आयटीआयमध्ये आयसीटीएसएम हा दोन वर्षांचा कोर्स आहे. या अभ्यासक्रमाची द्वितीय वर्षाची (फोर्थ सेमिस्टर) परीक्षा लेखी पद्धतीने होते. या विषयाची लेखी परीक्षा ८ ऑगस्टला घेण्यात येणार होती; परंतु ती १२ ऑगस्टला ऑनलाइन पद्धतीने अचानक घेतल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. सातपूर येथील आयटीआयच्या २३ आणि मुलींच्या १५, अशा ३८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. गणित व थेअरी या दोन विषयांच्या परीक्षेत अनेक प्रश्‍न हे अभ्यासक्रमाबाहेरचे विचारण्यात आले. गणिताला थिअरीचे प्रश्‍न विचारण्यात आले होते. या परीक्षेत फक्त तीनच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी मनविसेने आज केली. मनविसेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, संदीप भवर, सौरभ सोनवणे, एजाज शेख, सागर निगळ व अमोल भालेराव उपस्थित होते.

ऐनवेळी ऑनलाइनची परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. ऑनलाइन परीक्षेला अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्‍न होते. गणिताच्या पेपरला थेअरीचे प्रश्‍न विचारण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 
- प्रतीक पगारे, विद्यार्थी

‘आयसीटीएसएम’च्या फोर्थ सेमिस्टरचा पेपर ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने ती ऑनलाइन घेतली. अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असले, तरी परीक्षेत कोणताही घोळ झालेला नाही. ऑफलाइनचेच प्रश्‍न ऑनलाइन परीक्षेला विचारण्यात आले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त  प्रश्‍नांबाबत परीक्षा झाल्यानंतर लगेच तक्रार केली असती, तर काहीतरी करता आले असते. पण आता निकाल लागल्यानंतर काहीच करता येणे शक्‍य नाही. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून एक महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. 
- एस. आर. सूर्यवंशी, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com