पावसाच्या उघडीपीमुळे धरणांमधील विसर्गही घटला 

पावसाच्या उघडीपीमुळे धरणांमधील विसर्गही घटला 

नाशिक - आठवडाभर संततधार सुरू असलेल्या पावसाने आता उघडीप दिली असून, अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने विसर्गही घटला. नांदूरमध्यमेश्‍वर धरणातून आज दुपारी सुरू असलेला 15 हजार 248 क्‍युसेक कमी होऊन सायंकाळी तो 11 हजार क्‍युसेकपर्यंत खाली आला होता. दरम्यान, या वर्षी जुलै महिन्यात विक्रमी पाऊस पडल्यामुळे जिल्हा सरासरीच्या 68 टक्के पाऊस झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या धरणांमध्येही 61 टक्के साठा आहे. जिल्ह्यात आठवडाभर संततधार सुरू होती. त्यानंतर कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिली असली, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, पेठ व नाशिक या तालुक्‍यांत पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com