यवतमाळ : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पातील जलसाठा 40 टक्यावर पोहोचला आहे. हवामान खात्याने दिलेला अतीवृष्टीची शक्यता लक्षात घेता आज (ता.12) बेंबळा प्रकल्पातील 20 दरवाजे 25 सेमी ने उघडून प्रती सेंकद 500घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणारा निळोणा व चापडोह प्रकल्प कोरड्या पडल्याने शहरात मोठी टंचाई निर्माण झाली होती.
पावसाची संततधार सुरु असल्याने आज शहराला पाणीपुरवठा करणारा निळोणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून चापडोह प्रकल्पातही 45 टक्के साठा झाला आहे. त्यामुळे आज दिवसभर तिन्ही ठिकाणी शहरातील नागरिकांनी पावसात मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.