सामान्यांच्या समस्यांचा जल्लोष करणार का?; काँग्रेसचा सवाल

Congress
Congress

अकोला  ः इंधन दरवाढ, वाढलेली माहागाई, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, या सर्वसामान्यांच्या समस्यांचा भाजप जल्लोष करणार आहे का? असा प्रश्‍न उपस्थिती करीत काँग्रेसने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील आज कोणताच वर्ग समाधानी नाही. बेरोजगारी वाढली आहे. बँका अडचणीत आहेत. पिण्यासाठी पाणी नाही. मालमत्ता करांचा बोजा वाढला आहे. प्रत्येक आघाडीवर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. स्थानिक पातळीवरही भाजपची सत्ता आहे.पण नागरिकांच्या समस्या वाढतच आहे. या सर्व समस्यांचा जल्लोष भाजप करणार आहे का, असा प्रश्‍न काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्यासाठी शनिवारी स्वराज भवन येथून काँग्रेस मूक मोर्चा काढणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड, डाॅ. सुभाषचंद्र कोरपे, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव विखे पाटील, जिल्हा महासचिव हेमंत देशमुख आदींची उपस्थित होती.

२४ प्रश्‍न उपस्थित केले
सर्व सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या सोडविण्यात भाजपला अपयश आले, असे २४ प्रश्‍न उपस्थित करून सरकारला जाब विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com