ज्ञानाचा उपयोग देशासाठी करा - सीईओ रामकृष्णन मुकुंदन

नागपूर - विश्‍वेश्‍वरय्या पुरस्काराने अद्यपल्ली शालिनी हिला सन्मानित करताना टाटा केमिकल्स’चे एमडी आणि सीईओ रामकृष्णन मुकुंदन, बाजूला गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव एस. आर. साठे.
नागपूर - विश्‍वेश्‍वरय्या पुरस्काराने अद्यपल्ली शालिनी हिला सन्मानित करताना टाटा केमिकल्स’चे एमडी आणि सीईओ रामकृष्णन मुकुंदन, बाजूला गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, कुलसचिव एस. आर. साठे.

नागपूर - विदेशात जाऊन भक्कम पगराच्या नोकरी मिळविणे ही देशात फॅशन झाली आहे. मोठ्या संस्थेतून अभियत्यांची पदवी मिळाली की विद्यार्थ्यांचा कल हा विदेशाकडे असतो. मात्र, विदेशात न जाता आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी करा, असे आवाहन ‘टाटा केमिकल्स’चे एमडी आणि सीईओ रामकृष्णन मुकुंदन यांनी केले.

विश्वेवरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक अनुसंधान संस्थेचा(व्हीएनआयटी) दीक्षान्त सोहळ्‌यात ते बोलत होते. कार्यक्रमात व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, व्हीएनआयटीच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष विश्राम जामदार, कुलसचिव एस. आर. साठे, प्रत्येक शाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते.

रामकृष्णन मुकुंदन म्हणाले, आयआयटीमधून शिक्षण घेतले. त्यावेळी माझ्या सोबतचे सर्व मित्र आज विदेशातील मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करीत आहेत. मात्र, मी देशात राहून काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचे परिणाम आज आपणा सर्वांसमोर आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की देशाच्या विकासात आमचाही थोडासा वाटा आहे. काम करताना कुठलाही न्युनगंड बाळगू नका. २५ वर्षांपूर्वी एखाद्या संस्थेतून अभियंता बाहेर पडल्यावर त्याला नोकरी शोधावी लागत असे. आता ते चित्र बदलले आहे.

कंपनी संस्थेत नोकरी देण्यासाठी येते. त्यामुळे करिअरसाठी अनेक संधी आहेत. ऊर्जा, संशोधन, औद्योगिकीकरण, कृषी आणि सर्वच क्षेत्रात आपणास आमुलाग्र बदल करावा लागणार आहे. त्या बदलासाठी सज्ज व्हा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामकृष्णन मुकुंदन यांच्याहस्ते बी. टेक.च्या अद्यपल्ली शालीनी (इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲन्ड कम्युनिकेशन) हिला सर्व शाखांमधून प्रथम आल्याबद्दल ‘सर विश्वेश्वरया सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. यासह हरीश गुलाब खैरनकर, अपूर्व कुंडलकर यांनाही पदकांनी गौरवान्वीत करण्यात आले. तसेच ७२ पीएचडी, ३०७ एम.टेक., ५५ एम.एसस्सी., ५७ बॅचलर ऑफ आर्किटेक्‍चर आणि  ६७२ विद्यार्थ्यांना बी.टेक.च्या पदवीचे वितरण केले.  व्हीएनआयटीचे संचालक डॉ. पडोळे यांनी प्रास्ताविकातून संस्थेचा प्रगतीचा आढावा घेतला. कुलसचिव साठे यांनी आभार मानले.

अथक परिश्रमांचे फळ - अद्यपल्ली शालिनी
यंदाच्या दीक्षान्त समारंभात सर्वाधिक पुरस्कार प्राप्त करण्याचा मान बी. टेक.च्या अद्यपल्ली शालीनी (इलेक्‍ट्रॉनिक्‍स ॲन्ड कम्युनिकेशन) हिने पटकाविला. ती सध्या बंगलोर येथील सिस्टमॅटीक इंडिया प्रा. लि. कंपनीमध्ये प्रोजेक्‍ट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. शालीनी मूळची आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील असून वडील व्यवसायिक आहेत. आई गृहिणी आहे. भविष्यात तिला रोबोटीक्‍सच्या क्षेत्रात करिअर करायचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com