रिलायन्सने थकवले दोन हजार कोटी - मुख्यमंत्री

रिलायन्सने थकवले दोन हजार कोटी - मुख्यमंत्री

नागपूर - देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे जवळपास दोन हजार कोटी रुपये थकविल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेच्या तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीत दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार शरददादा सोनावणे यांनी विविध उद्योगपती, संस्था, हॉटेल्स आदींनी एमएमआरडीएला देय असलेली रक्कम थकविल्याबाबत प्रश्न विचारला होता. एमएमआरडीएने आपल्या मालकीच्या वांद्रे- कुर्ला संकुलातील जी ब्लॉक मधील भूखंडाचे वाटप केले आहे. या भूखंडावरील इमारतींचे बांधकाम चार वर्षांत पूर्ण करायचे होते. मात्र भूखंड मिळालेल्या संस्थानी विहित कालावधीत बांधकाम पूर्ण न केल्याने एमएमआरडीएने अधिमूल्याची भरणा करण्यासाठी, तसेच भूखंड परत घेण्याबाबत नोटीस बजावली असल्याचे फडणवीस यांनी उत्तरात नमूद केले आहे. 

मुख्यमंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१७ अखेर रिलायन्स इंडिस्ट्रीजकडे भूखंड क्रमांक सी ६६ पोटी चारशे कोटी रुपये, तर सी ६४च्या भूखंडापोटी एक हजार ५३८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. इंडियन न्यूजपेपर सोसायटीकडे ५६ कोटी, जमुनाबेन फाउंडेशनकडे २४ कोटी, तालीम रिसर्च फाउंडेशनकडे ३३ कोटी, तर नमन हॉटेलकडे ३१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com