Maratha Kranti Morcha : आंदोलनस्थळी पार पडला शुभविवाह

akola
akola

गांधीग्राम (अकोला) - मराठा सकाल समाजाने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्याला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधीग्राम येथील अकोट विवाह सोहळा पार पडणाडर होता. बंद असल्यामुले काय होणार असा प्रश्न त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना पडला होता. परंतु, मराठा आंदोलनाच्या स्थळीच त्यांचा शुभविवाह पार पडला.

गांधीग्राम (ता.अकोला) येथील पांडुरंग अढाऊ यांचा मुलगा चि. अभिमन्यु व देऊळगाव (ता.अकोट) येथील हरिदास गावंडे यांची कन्या चि.सौ.कां.तेजश्विनी यांचा विवाह रितिरिवाजप्रमाणे गुरुवार दि.९ ऑगस्ट रोजी करण्याचे ठरविले होते. मात्र मराठा समाजाचा मोर्च्याची तारीख तीच ठरली, सर्वांच्या मनात धाकधूक सुरू होती. नेमके काय करायचे समजत नव्हते. लग्नाची तारीख रद्द करता येत नव्हती कारण सर्व तयारी आटोपली होती, व दुसरी तिथही निघणार नव्हती.

अशातच गुरुवारी सकाळी वऱ्हाड लग्नाला अकोटला निघालं मात्र लग्नाचे वऱ्हाडी आहेत म्हणुन आंदोलकांनी वाहनांना अडविलेही नाही, शिवाजी चौक अकोट येथे मोठ्या प्रमाणात जमाव होता अशातच आंदोलकांनी शिवाजी चौकात लग्न लावण्याची विनवणी केली. लगेच वधू व वर पक्षाने ही विनवणी मान्य केली व शिवाजी चौक अकोट येथे त्यांचा शुभविवाह लावण्यात आला. यावेळी मंगलाष्टके म्हणुन विवाह पार पडला.

त्यांनतर रितिरिवाजप्रमाणे ए.पि.एम.सी.अकोट येथे बाकीचे सर्व कार्यक्रम पार पडले. यासाठी अकोटच्या कार्यकर्त्यांनी शांततेत कार्यक्रम पार पाडण्यासाठी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com