'राष्ट्रसंतांचे साहित्य सकारात्मक ऊर्जेचा स्त्राेत'

Sachin Burghate
Sachin Burghate

अकाेला : आयुष्यात अनेक नकारात्मक गाेष्टी घडत असतात. अशा परिस्थितीत सकारात्मक ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा राष्ट्रसंतांच्या साहित्यात आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्ते सचिन बुरघाटे यांनी केले.

पाचवे राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ‘राष्ट्रसंतांना अपेक्षीत युवक’ या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बाेलत हाेते. युवकांनी कसे वागावे, कसे जगावे, समाजासाठी काय योगदान द्यावे, याचा संपूर्ण सार राष्ट्रसंतांच्या विचारात आहे. याच विचारातून प्रेरित झालेल्या राजेश ताले हा युवक युवकांसमाेर आदर्श प्रेरणा म्हणून समाेर आला आहे. निराशेच्या गर्त्यात अडकलेल्या युवकांना प्रेरणेची गरज असते. त्यासाठी स्वाभिमानी युवक तयार व्हायला हवा. सिंगापूरच्या बजेटचा ७५ टक्के निधी हा शिक्षणासाठी दिला आहे. या धाेरणानुसार सिंगापूर सरकारने भविष्यातील पिढी तयार केली असून, आज हा देश टाॅप १० देशात गणला जाताे. राष्ट्रनिर्माणासाठी अशा आदर्शाची गरज असल्याचे यावेळी सचिन बुरघाटे यांनी म्हटले. जीवनात अनेकदा अपयश येईल, निराशा येईल. पण, त्यावर मात करण्यासाठी प्रेरणा हवी, हीच प्रेरणा आदर्श युवकांकडून युवकांना मिळेल.

समाजात वाईट गाेष्टी स्वतःहूनच घडत असतात. पण, चांगल्या गाेष्टीसाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते. चांगल्या विचारांचे संगाेपण केल्याशिवाय सकारात्मक ऊर्जा निर्माण हाेणार नाही. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगले साहित्य वाचा असे आवाहन देखील यावेळी सचिन बुरघाटे यांनी युवकांना केले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष रत्नपारखी हाेते. सचिन बुरघाटे यांच्यासह प्रशांत ठाकरे, स्वप्नील इंगोले, शिवाजी भोसले या युवा व्याख्यात्यांनी ‘राष्ट्रसंतांना अपेक्षीत युवक’ या विषयावर आपले विचार व्यक्त केले. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष रत्नपारखी हाेते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला युवक या संमेलनाच्या माध्यमातून तयार होईल, असा आशावाद विषद केला. या सत्राचे संचालन सचिन मोहोकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन धर्मपाल चिंचोळकार यांनी मानले.

आधुनिक जगात युवक हरवला - प्रशांत ठाकरे
राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला युवक आजच्या आधुनिक जगात हरवल्याची खंत व्यक्त केली. त्यांना गरज आहे ती राष्ट्रसंतांच्या विचारांची. त्यासाठी असे साहित्य संमेलनाची गरज आहे, अशा बाणेदार शैलीतून आजच्या युवकांच्या मनाच्या अवस्थेवर प्रशांत ठाकरे यांनी प्रहार केला.

समाज घडविण्यासाठी युवकांनी संघटीत व्हावे- स्वप्निल इंगोले
आजच्या युवकांनी हा समाज घडविण्यासाठी संघटीत होण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांच्या ओळीनुसार प्रत्येकाने ग्रामोन्नतीच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले पाहिजे तरच आधुनिक भारताचा उदय होईल, असा युवक राष्ट्रसंतांना अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंतांचे साहित्य जगण्याचे बळ देते- शिवाजी भोसले
राष्ट्रसंतांचे साहित्य हे जगण्याला बळ देणारे साहित्य असून, युवकांनी ग्रामगीता डोक्यात ठेवली पाहिजे, असा विचार शिवाजी भाेसले यांनी मांडला. देवळात देव शोधल्यापेक्षा आईवडिलांना आदर्श मानणारा युवक हवा आहे. राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला युवक हा लाचार नसावा तर स्वाभीमानी असावा. त्यासाठीच घराेघरी ग्रामगीता पाेहाेचली पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com