जलपातळीत चिंताजनक घट

जलपातळीत चिंताजनक घट

अमरावती - राज्यातील १२६ तालुक्‍यांतील सात हजार २५६ गावांतील भूजल पातळी एक मीटरहून अधिक घसरल्याने या गावांत यंदा भीषण पाणीसमस्या उद्भवू शकते, असा धक्कादायक अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्तविला आहे. २०१७ मध्ये मॉन्सून सरासरीपेक्षा २० टक्‍क्‍यांहूनही अधिकतर कमी झाल्याने भूजलात ही तूट आली. 

भूजल सर्वेक्षण विभागाकडून वर्षातून चार वेळा भूगर्भातील जलपातळी तपासली जाते. पाणलोट क्षेत्रातील तीन हजार ९२० निरीक्षणे करत विहिरींमधील पाण्याची पातळी मोजली गेली. जानेवारी २०१८ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पाणीपातळी खालावल्याचे वास्तव निदर्शनास आले. अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेल कोरड्या झाल्यात. याचा परिणाम राज्यात एप्रिल ते जूनदरम्यान भीषण पाणीसमस्या डोके वर काढणार, असा अंदाज जीएसडीएने वर्तविला. राज्यातील एक हजार ३७६ गावे अधिकतर दुष्काळाच्या प्रभावात असणार आहेत.

कमी पावसाचा परिणाम 
राज्यातील ३५३ तहसीलमध्ये २० टक्‍क्‍यांहून कमी पाऊस झाला. ४५ तहसीलमध्ये हे प्रमाण २० ते ३० टक्के, ८० तहसीलमध्ये ३० ते ५० आणि १९ तहसीलमध्ये त्यापेक्षाही अधिक असल्याचे म्हटले आहे. भीषण पाणीसमस्या निर्माण होऊ शकणाऱ्या १२० पैकी ७४ तहसील एकट्या विदर्भातील आहेत. यात अकोला ४, अमरावती १३, बुलडाणा ३, चंद्रपूर १४, गडचिरोली ६, गोंदिया ८, नागपूर २, भंडारा ३, वर्धा ३, वाशीम ४ आणि यवतमाळ १४ यांचा समावेश आहे. या अकरा जिल्ह्यांतील एक वा त्यापेक्षाही अधीक मीटरने पाणीपातळी घसरलेल्या गावांची संख्या ६,४३५ असून त्यात अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियातील गावांाचा समावेश आहे. 

जलपातळीतील घट
१ मीटर : १०,३८२  गावांतील जलपातळीत झालेली घट
२ मीटर : ६,५४६  गावांतील जलपातळीत झालेली घट
३ मीटर : १,३७६   गावांतील जलपातळीत झालेली घट
२० टक्के : ७,२५६  गावांमधील पावसातील घट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com