बोंडअळीवरून सत्ताधाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

बोंडअळीवरून सत्ताधाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे

नागपूर - विदर्भ, मराठवाडा व खानदेशमधील १५ जिल्ह्यांतील ४२.०६ हेक्‍टरवर बनावट बियाण्यांमुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासंदर्भात शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणे गरजेचे होते. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. यावर सत्ताधाऱ्यांकडून मदत करण्याची इच्छा नाही, असा आरोप करून विरोधकांनी विजय वडेट्टीवार यांच्या लक्षवेधीवरून सभात्याग केला.

विजय वडेट्टीवार यांच्या राखून ठेवलेल्या लक्षवेधीवर चर्चा करण्यात आली. सुरुवातीलाच सदस्याने हरकतीचा मुद्दा उपस्थित करून उत्तरात तफावत असल्याचे सांगितले. प्रश्‍नावलीत याच उत्तरात ४० लाख हेक्‍टर, तर लक्षवेधीच्या उत्तरात ४२.०६ लाख हेक्‍टरचा समावेश असल्याचे सांगितले. त्यावर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी २०१७ साली असलेल्या आकडेवारीचा  उल्लेख असल्याने ही आकडेवारी योग्य असल्याचे स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात असताना मदत मिळालेली नाही, असे म्हटले. त्यावर कृषिमंत्र्यांनी पाच लाख हेक्‍टरचे नुकसान झाले हे खरे असल्याचे स्पष्ट केले. तसेच ११ तारखेपर्यंत जवळपास पाच लाख दोन हजार २१२ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केल्याचे सांगितले. भरपाईसाठी पंचनाम्याचे आदेश दिले असून, पीकविमा योजनेतून त्यांना मदत करण्यात येईल असेही स्पष्ट केले. 

कृषिमंत्र्यांचे घुमजाव
बीटी बियाणे देणाऱ्या ‘महिको-मॉन्सॅन्टो’ कंपनीवर कारवाई करणार काय, या प्रश्‍नावर  कृषिमंत्र्यांनी घुमजाव करीत अधिवेशन संपण्याचा आत नुकसानभरपाई देण्यात येईल असे स्पष्ट केले. त्यावरून सत्ताधारी कुठलेच ठोस आश्‍वासन देत नसल्याचे सांगून विरोधकांनी सभात्याग केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com