वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी शेतकऱ्याला अटक

wardha
wardha

कारंजा (घा) छ काल सकाळी आंभोर येथील यशोदा भगवान टेकाम यांच्या शेतात विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्या प्रकरणी त्यांचा मुलगा रामकृष्ण भगवान टेकाम याला वनविभागाने रात्री उशिरा कारवाई करून वन्यजीव सरंक्षण कायदा 1972 अधिनियम 2,9,11,50,51 चा गुन्हा दाखल करून अटक केली.

या शेतकऱ्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. वाघिणीचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचा नाहक गुन्हाच बळी तर झाला नाही ना. आपल्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेताला तार कंपाऊंड करून त्यात विद्युत प्रवाह लावला होता. हे तरी बेकायदेशीर असले तरी ही वाघिणीचा जीव गेला नसता जर तो विद्युत पुरवठा रात्रीला महावितरण विभागातून बंद केला असता तर त्यात ही घटना घडली नसती. न शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झाला नसता वनविभागाचे डोकेदुखी बंद झाले असले तरी शेतकऱ्याचे डोकेदुखी वाढली आहे. शेतातील पिकांचे वन्य प्राणी नुकसान करते यात पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी करावे तरी काय हा प्रश्न आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com