पंधराशे गावांना टॅंकरने पाणीपुरवठा 

पंधराशे गावांना टॅंकरने पाणीपुरवठा 

अकोला - तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले असल्याने राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांमध्ये टॅंकरे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे या गावांतील लाखो नागरिकांना तहान भागविण्यासाठी टॅंकरच्या पाण्यावर अलवंबून राहावे लागते आहे. 

भूजल पातळी खोल गेल्याने व राज्यातील बहुतांश जलाशयांमधील पाणी आटल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढते आहे. काही धरणे ही पूर्णतः कोरडीठाक पडली आहेत. परिणामी अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

राज्यातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना सध्या एकूण एक हजार 622 टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये 195 टॅंकर शासकीय, तर एक हजार 427 टॅंकर खासगी मालकीचे आहेत. राज्यातील एक हजार 568 गावे व एक हजार 246 वाड्यांवरील लाखो नागरिकांची तहान टॅंकरने भागवण्यात येत आहे. या वर्षी मॉन्सूनचे आगमन लांबल्यास टॅंकरची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

भूजल पातळी खालावली 
बहुतांश जलाशयांमधील पाणी आटले 
अनेक ठिकाणच्या पाणीपुरवठा योजना बंद 
टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढतेय 

टॅंकरने सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याची माहिती 
विभाग गावे वाड्या टॅंकर 

अमरावती 306 00 300 
कोंकण 173 508 95 
खानदेश 299 311 247 
पुणे 74 283 67 
मराठवाडा 673 144 872 
नागपूर 43 00 41 
--------------------------------------- 
एकूण 1,568 1,246 1,622 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com