देशात ८० टक्के रब्बी पेरणी पूर्ण

देशात ८० टक्के रब्बी पेरणी पूर्ण

नवी दिल्ली - देशात शुक्रवार (ता. ७) अखेर ८० टक्के रब्बी पेरणी आटोपली आहे. आतापर्यंत ५८६.३७ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरा झाला असून, गतवर्षी या कालावधीत ५८७.६२ हेक्‍टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. गहू आणि तेलबिया लागवडीखालील क्षेत्र मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्याप कमीच आहे.

देशभरात गव्हाची सुमारे ३०१.७४ लाख हेक्टरवर सरासरी लागवड होते. यंदा गव्हाची लागवड काहीशी कमीच आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि महाराष्ट्रातील गव्हाच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याने देशाची एकूण गहू लागवड ४.७७ टक्क्यांनी माघारली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गहू लागवड अद्याप १४.२० लाख हेक्टरने कमी अाहे. गेल्या वर्षी या कालावधीत गव्हाची २९७.६७ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा ती २८३.४६ लाख हेक्टरपर्यंत पोचली आहे.

तेलबियाखालील क्षेत्रही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ८०.७७ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड झाली होती. यंदा ती ७६.६९ लाख हेक्टरपर्यंत पोचली आहे. तुलनेत पेरणी चार लाख हेक्टरने माघारलेली आहे.

कडधान्य, भातपेरा वाढला
भात आणि कडधान्यांची लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत भाताची लागवड १२.९९ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा ती १८.७७ लाख हेक्टरवर पोचली आहे. कडधान्यांची लागवड १५४.९१ लाख हेक्‍टरवर झाली असून, गतवर्षी ती १४३.४५ लाख हेक्‍टर होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com