शेतमालासाठी पणन मंडळ १०० गाेदामे उभारणार

शेतमालासाठी पणन मंडळ १०० गाेदामे उभारणार

राज्यातील धान्य साठवणूक क्षमता एक लाख मेट्रिक टनांनी वाढणार

पुणे  - राज्यातील अन्नधान्याच्या वाढणाऱ्या उत्पादनानंतर दर कमी हाेण्याची जाेखीम करण्याबराेबर, खरेदी केंद्रांअभावी धान्य खरेदीची समस्या निर्माण हाेऊ नये, यासाठी राज्यात पणन  मंडळाच्या माध्यमातून १०० गाेदामे नव्याने बांधण्यात येणार आहे. या नव्याने बांधण्यात येणाऱ्या गाेदामांमुळे धान्य साठवणुकीची क्षमता एक लाख मेट्रिक टनांनी वाढणार असून, शेतमाल तारण याेजनेला प्राेत्साहन देण्यासाठी या गाेदामांचा प्रामुख्याने वापर हाेणार आहे. 

गाेदामे उभारण्यासाठी ८० बाजार समित्यांनी प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविले आहेत. गाेदामे उभारण्यासाठी २५ टक्के अनुदान शासनाने द्यावे, अशी मागणी पणन मंडळाने शासनाकडे केली आहे. राज्याची धान्य साठवणूक क्षमतावाढीसाठी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाला १०० गाेदामे उभारण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार गाेदामे बांधण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील विविध १०० बाजार समित्यांकडून अहवाल मागविण्यात आले हाेते. त्यानुसार, ८० बाजार समित्यांनी सकारात्मक अहवाल पाठविले असून, त्यांनी पाठविलेले अहवाल आणि उपलब्ध जागांची पाहणी करून अंतिम आराखडा बनविण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

याबाबत बाेलताना पवार म्हणाले, ‘‘तुरीच्या वाढलेल्या उत्पादनामुळे झालेली खरेदी समस्या भविष्यात हाेऊ नये, यासाठी राज्याची शेतमाल साठवणूक क्षमता वाढीसाठी १०० गाेदामे पणन मंडळाच्या वतीने उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. ही गाेदामे बाजार समित्यांच्या जागांवर उभारण्यात येणार असून, तशी माहिती बाजार समित्यांकडून मागविण्यात आली हाेती. 

त्यानुसार ८० बाजार समित्यांनी प्रस्ताव पाठविले आहेत. यासाठीचा निधी उभारत असताना, राष्ट्रीय कृषी विकास याेजनेतून २५ ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान शासनाने द्यावे, २५ टक्के भांडवल पणन मंडळ कर्ज रूपाने बाजार समित्यांना देईल आणि २५ टक्के स्वनिधी बाजार समित्यांनी वापरावा. या धर्तीवर प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. लवकरच या प्रस्तवाला मान्यता मिळून प्रत्यक्षात गाेदामे उभारण्याची प्रक्रिया सुरू हाेईल. 

तारण याेजनेत वाढताेय शेतकऱ्यांचा सहभाग
पणन मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शेतमाल तारण याेजनेत गेल्यावर्षी ३२ बाजार समित्या सहभागी झाल्या होत्या. यंदा १०० बाजार समित्या सहभागी झाल्या असून, गेल्यावर्षी १ हजार ६७४ शेतकऱ्यांना १९ कोटी १० लाख रुपयांचे तारण कर्जवाटप झाले हाेते. ते सुमारे तिपटीने वाढून ४ हजार ८३२ शेतकऱ्यांना ४४ कोटी ८० लाख रुपयांचे तारण कर्जवाटप झाल्याची माहिती मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com