गटशेतीचे सादरीकरण नुकतेच मंत्रालयात माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर सचिवांसमोर करण्यात आले. योगायोगाने नंतर महाराष्ट्र शासनाने २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात गटशेतीसाठी २०० कोटी रुपये अशी तरतूद केली. माझ्या दृष्टीने ग्रामीण भागासाठी ही एक अतिशय उत्साहवर्धक बाब आहे.
अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. काडर यांना मी भारतीय शेती परवडत नाही, अमेरिकेत मात्र असे नाही? असे विचारले असता, त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले. भारतामध्ये सरासरी दोन एकर जमीन धारणा असून, तीच अमेरिकेत मात्र सहा हजार एकर आहे. यातच आपल्या शेतकऱ्यांची दुर्दशा सामावली आहे. असा विचार करून मी १९८६-८७ पासून जालना जिल्ह्यात गटशेतीस सुरवात झाली. गटशेतीतूनच उच्चतंत्रज्ञान मिळविणे, आत्मविश्वास निर्माण करणे, गावातील वेगवेगळे वाद कमी करणे, उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे, विक्रीच्या माध्यमातून चांगले दर मिळविणे, पर्यायाने गावचे मानसी उत्पन्न वाढविणे हे शक्य होते. त्यातूनच व्यसनाधिनता कमी होऊन गावकऱ्यांची वैचारिक पातळी वाढते. गावचा एकूणच आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकास होण्यासही हातभार लागतो. या सर्व बाबी प्रत्यक्ष जालना जिल्ह्यातील गटशेतीने यशस्वी करून दाखविल्या आहेत. या प्रत्यक्ष राबविलेल्या गटशेतीचे सादरीकरण नुकतेच मंत्रालयात माननीय मुख्यमंत्र्यांचे उपमुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर सचिवांसमोर करण्यात आले. योगायोगाने नंतर महाराष्ट्र शासनाने २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात गटशेतीसाठी २०० कोटी रुपये अशी घसघशीत तरतूद केली. माझ्या दृष्टीने ग्रामीण भागासाठी ही एक अतिशय उत्साहवर्धक बाब आहे.
गटशेतीसाठी तरतूद करण्यात आली; मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना काही बाबी विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यात गट स्थापन करत असताना लगेच अध्यक्ष-उपाध्यक्ष नेमून १०-२० लोकांची गट नोंदणी होते. त्यात गटातील कोण चांगले कार्य करू शकेल, हे लक्षात न घेता नावनोंदणी होते. गटातील सर्व शेतकऱ्यांना गटाच्या ध्येयधोरणांची माहिती नसते. गट फक्त अनुदान मिळविण्यासाठी अशी त्यांची धारणा होते. त्यासाठी गट नोंदणी सुरवातीलाच न करता, नोंदणीशिवाय निदान एक वर्ष गटाने कार्य करणे, त्याचबरोबर गट स्थापनेसाठी व गट चालवण्यासाठी खास शासकीय व इच्छुक कर्मचाऱ्यांची काही गटांसाठी पूर्ण वेळ नेमणूक करावी, जेणेकरून तो कर्मचारी / अधिकारी नियमित काही गावातील शेतकऱ्यांसोबत राहून गटाला तीन चार वर्षांत ताकदवान बनवू शकेल. अशा अधिकाऱ्यास शासनाकडून खास प्रोत्साहन आवश्यक आहे.
गटामध्ये कोणतेही तंत्रज्ञान घ्यावयाचे झाल्यास त्यातील अतिशय तज्ज्ञ व्यक्तींकडूनच शक्य तितके बिनचूक तंत्रज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी गरजेप्रमाणे वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांचे गट तयार करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर गट शेतीबद्दल काही सूचना/मुद्दे मांडत आहे :
निकषाबद्दल काही मुद्दे :
मला खात्री आहे अशा प्रकारे विचार झाल्यास गटशेतीतून नक्कीच ग्रामीण महाराष्ट्र समृद्ध होईल
(लेखक फळबाग तज्ज्ञ तथा गटशेतीचे प्रवर्तक आहेत.)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.