महाराष्‍ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

onion
onion

पुणे - कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी खंडीत झाल्याने शेतकरी आणि ग्राहक हवालदिल झाले आहेत. हि साखळी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाराष्‍ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार असून, राज्यातील सुमारे ११२ शेतकरी उत्पादक कंपनी आणि गटांची यादी देशातील विविध पणन मंडळांना पाठवली आहे. याद्वारे देशातील विविध खरेदीदार थेट कंपन्या आणि गटांशी बोलून कांदा खरेदी करणार आहे. 

याबाबतची माहिती कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. पवार म्हणाले,‘‘कोरोना लॉकडाऊनमुळे शेतमालाची पुरवठा साखळी खंडीत झाली आहे. राज्यातून देशात कांदा मोठ्याप्रमाणावर पाठविला जातो. सध्या वाहतूक बंद असल्याने शेतमालासह कांद्याचा उठाव कमी झाला आहे. प्रसंगी दर देखील कमी झाले आहेत. ही खंडीत झालेली पुरवठा साखळी सुरळीत होऊन, कांद्याचा उठाव व्हावा आणि शेतकऱ्याला दिलासा मिळावा यासाठी राज्यातील कांद्या मध्ये काम करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गटांची यादी देशातील सर्व कृषी पणन मंडळांना पाठवली आहे. या मंडळांद्वारे खरेदीदार राज्यातील कंपन्यांशी संपर्क साधून कांदा खरेदी करु शकणार आहे. खरेदी झालेला कांदा इतर राज्यांमध्ये पाठविण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून, यासाठी आंतरराज्य शेतमाल वाहतूक नियंत्रण कक्ष आणि टोल फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com