नवी दिल्ली - देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून मिळाली.
देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांकडून गाळप केले गेले. तर मागील वर्षी याच काळात ५११ साखर कारखाने सुरू होते. साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा ११९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. मागील वर्षी याच काळात ११७ साखर कारखाने सुरू होते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४३.८ लाख टन साखर निर्मिती केली होती. तर मागील वर्षी याच काळात ४१.९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन वाढले आहे.
कर्नाटकातील ६३ साखर कारखान्यांनी २१.९ लाख टन साखर उत्पादन घेतले. गेल्या वर्षी याच काळात ६५ साखर कारखान्यांनी २६.८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. कर्नाटक साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तीन नंबरवर आहे.
देशातील साखर कारन्यांकडे २०१८-१९ मधील हंगामातील साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.
१५६ कोटी इथेनॉल पुरवठा होणार
‘इस्मा’ने म्हटले आहे, की देशातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांशी पहिले करार केल्याप्रमाणे १५६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. करार झालेल्या १५६ कोटी लिटर इथेनॉलपैकी सहा हजार १६३ लाख लिटर इथेनॉल हे बी-हेव्ही मोलॅसिसपासून बनविले जाणार आहे. तर, १०६० लाख लिटर इथेनॉल थेट उसाच्या रसापासून बनविले जाणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.