Ahmednagar : पराभवाच्या भीतीनेच निवडणुका पुढे ; प्राजक्त तनपुरे

जनसंवाद यात्रा लोकांना धीर देणारी
 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरेsakal

पाथर्डी : पराभवाची भीती वाटत असल्यानेच राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  निवडणुका  पुढे ढकलत आहे. या काळात ॲड. प्रताप ढाकणे यांनी काढलेली जनसंवाद यात्रा लोकांना धीर देणारी ठरत असून, या यात्रेमुळे जनता व नेत्यांमधील अंतर कमी होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.

ॲड. ढाकणे यांच्या जनसंवाद यात्रेनिमित मिरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी ॲड. ढाकणे, शिवशंकर राजळे, रफिक शेख, भगवान दराडे, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, अमोल वाघ, राजेंद्र म्हस्के, प्रकाश शेलार, अभिजित ससाणे, राहुल गवळी उपस्थित होते. आमदार तनपुरे म्हणाले, की राज्य सरकार शेतकऱ्यांची वीज तोडण्याचे काम करत आहे. मिरी भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण शिराळ येथील उपकेंद्राची मंजुरी घेतली असून, त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन लावला, तर अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांच्या मोठा दबाव दिसून येत आहे. अधिकाऱ्यांना कामासाठी फील्डवर बोलावले, तर पालकमंत्र्यांच्या परवानगी शिवाय आम्ही येऊ शकत नाही, असे उत्तर ते देतात. जनतेचे प्रश्‍न सुटणार नसतील, तर आमचे आमदारपद मिरवण्यासाठी आहे का, असा प्रश्न शेवटी तनपुरे यांनी उपस्थित केला.

ॲड. ढाकणे म्हणाले, की जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही जुनी मागणी आहे. निधीच्या बाबतीत नगर दक्षिणेवर नेहमी अन्याय झाला आहे. विभाजनाचा विषय निघाला की मुख्यालय श्रीरामपूरला असावे की संगमनेरला, या विषयावर वाद निर्माण करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचे काम केले जाते. आभार उद्धव दुसंग यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com